मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निकाल दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असून दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून याचा जोरदार विरोध केला जात असून या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. तर शिंदे गटाकडून याचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…राहुल नार्वेकर कोणत्या गटाच्या आमदारांचा गेम करणार? वाचा संपुर्ण यादी
आवाज कुणाचा शिवसेनेचा. ही ताकद कुणाची शिवसेनेची हा विजय कुणाचा शिवसेनेचा असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या प्रकरणात शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही असा दिलेला निकाल आणि दुसरीकडे आमच्याकडे असलेला पक्षच खरी शिवसेना यावर केलेले शिक्कामोर्तब. या निर्णयामुळे आनंदित झालेल्या असंख्य शिवसैनिकांनी काल रात्री परतल्यावर मुंबई विमानतळावर माझे जंगी स्वागत केले असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर वकिल उज्ज्वल निकम यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
अवघड वाटेवरून पुढे जाताना आज झालेला हा विजय माझा एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास टाकून माझ्या भूमिकेला समर्थन देणाऱ्या हजारो लाखो सर्वसामान्य शिवसैनिकांचा विजय आहे. तसेच घराणेशाहीच्या बळावर आपण लोकांवर हवे ते लादू शकतो. असा समज असलेल्या लोकांचा गैरसमज देखील या निर्णयाने कायमचा दूर केला असल्याचंही शिंदे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच..!देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र निकाल, विधीमंडळात शिंदे अन् ठाकरे गटाचे कोण कोणते आमदार उपस्थित ?
हेही वाचा…निकालाची दुसरी बाजू, तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार? भाजपचा प्लॅन बी काय ?
हेही वाचा…निकाल आधीच ठरलाय..! राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटाची आक्रमक भूमिका
हेही वाचा…“खासदार हेमंत पाटलांचं बळ वाढलं,” मुख्यमंत्र्यांची आज हिंगोलीत जाहीर सभा