परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या पदनियुक्तीवरुन शिवसेना-राष्ट्रवादीतील राजकीय वाद आता चव्हाट्यावर आला आहे. गोयल यांच्या नियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, त्यांची मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. पण त्यांची नियुक्ती होऊ नये यासाठी, शिवसेना खासदाराने थेट मंत्रालयात लॉबिंग केल्याची चर्चा होती. या प्रकरणावर आता शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबईची लोकल रेल्वे भाजपाची नोकर आहे का? संजय राऊतांचा रावसाहेब दानवेंना प्रश्न
“लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू. माकडीण सुद्धा जेव्हा स्वतः बुडायची वेळ येते, तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला असंच घालू. फक्त कलेक्टर बदलायची मी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली, पण त्यासाठी त्यांनी एवढं रान पेटवलं. आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे”, असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. जालन्यातील शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर जाहीर कार्यक्रमात संजय जाधव बोलत होते.
आमच्याकडे क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा नाही; राज्य सरकारनेच ती उभारावी – रावसाहेब दानवे
जालन्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर, ३१ जुलैला आंचल गोयल पदभार स्वीकारणार होत्या. त्या २ दिवस आधीच जालन्यात आल्या असताना, पदभार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवा असा संदेश मुगळीकर यांना सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आला आणि गोयल यांची बदली रद्द करण्यात आली. याची माध्यमांनी दखल घेतली आणि मग समाजमाध्यमावरही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.
मोदी सरकार आज दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडणार; मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार?
यावरून परभणीत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलनही केलं. शेवटी जागरूक नागरिक आघाडी या नावाने लोक एकवटल्यानंतर २४ तासांच्या आत अंचल गोयल याच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे पालकमंत्र्यांना जाहीर करावे लागले आणि या विषयाला पूर्णविराम मिळाला होता. मात्र आता पुन्हा संजय जदहावं यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या या भडकावू विधानाने पुन्हा एकदा या विषयाला तोंड फुटले आहे. यावर आता राष्ट्रवादी काय प्रत्युत्तर देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
Read Also :
- “आता ट्रायलला पण भडकता की काय?” उपमुख्यमंत्र्यांनी लगावला भाजपला जोरदार टोला
- मोठी बातमी! १५ ऑगस्टपासून लसींचे २ डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना करता येणार लोकल प्रवास
- ‘‘कुणी विचारलं तर पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला सांगा’’, अजित पवारांचा आरोग्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे टोला
- मोठी बातमी! उद्यापासून पुणे अनलॉक, दुकाने आता दिवसभर खुली, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु
- भाजप आमदार-खासदारांच्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठका, दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का?