मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजप-शिवसेना कार्यकर्ते शिवसेनाभवना समोर एकमेकांशी भिडले. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान यांनतर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित, पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या मैदानात लेटरबॉम्ब टाकला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केला असून, भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला, त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
हे पण वाचा, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री नाना पटोलेंवर नाराज? आघाडीत अस्वस्थता वाढली!
यांनतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे. दरम्यान, या पत्रावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, “विनाकारण त्रास कोण आणि कशासाठी देतोय, हे महत्वाचं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून विनाकारण होणारा त्रास त्यांना सहन होत नसेल, म्हणून आपलं म्हणणं त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केलं असेल,” असं सांगत त्यांनी, “आघाडी सरकार ५ वर्षे चालणार,” असा पुनरुच्चार केला.
हे पण वाचा, पवारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, नव्या पर्यायाची भूमिका करणार जाहीर?
दरम्यान, यावर आता चंद्रकांत पाटील यांनी खोचक टीका केली असून, “शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर संजय राऊत यांनी बोललं पाहिजे. त्यांनी शरद पवारांच्या पे रोलवर राहून बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात. आम्हाला हिंदुत्व पाहिजे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी हाच संदेश आम्हाला दिला आहे, पूर्वीच्या युतीत आम्ही समाधानी होतो, आत्ताची युती नैसर्गिक नाही, अशा सगळ्या शिवसैनिकांच्या भावना आहेत. त्या राऊतांनी मांडल्या पाहिजेत,” असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
हे पण वाचा, महाविकास आघाडी सरकार कडून पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचं! भाजपकडून जोरदार टीका
यावर आता विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले असून, “भाजप-शिवसेना युती नैसर्गिक होती. पण, भाजपने बेईमानीचा कळस गाठला, म्हणून सेनेला भाजपपासून दूर व्हावं लागलं. त्यामुळे, चंद्रकांत पाटलांनी, संजय राऊतांना शहाणपणा शिकविण्याची गरज नाही. त्यांनी स्वतःच्या बुडाखाली आधी जे काही जळतंय, ते आधी सांभाळावं. केंद्राने संपूर्ण देशात, ईडी, सीबीआय, एनआयएचा ससेमिरा लावायचा आणि विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास द्यायचा, हा एकमेव धंदा भाजपने चालू केलेला आहे”, अशी घणाघाती टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
Read Also :
- विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका; भावांमुळे वडिलांची ही अवस्था झाल्याचा मुलीचा आरोप
- खासदार नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती
- उच्च न्यायालायने पोलीस आयुक्तांना दिले, संजय राऊत यांच्या चौकशीचे आदेश
- देशात भाजप-काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसरी आघाडी होणार का? बाहेर आलं स्पष्टीकरण
- मंत्रीपद घेतलं म्हणजे सगळं बटण सारख व्यवस्थित होते असं नाही – बच्चू कडू