मुंबई : मंत्रीपद घेतलं म्हणजे सगळं बटण सारख व्यवस्थित होते असं नाही. काही गोष्टी या आंदोलनाच्या माध्यमातूनच झाल्या पाहिजे. आंदोलन किंवा चळवळी या जिवंतपणा आणण्यासाठी कराव्या लागतात. जर प्रशासनावर अंकुश आणि सामान्य माणसांना लोकाभिमूख प्रशासन हवं असेल तर ही वेशांतर करुन स्टिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी संवाद साधत होते.
हे पण वाचा, ‘ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं’, मंत्री बच्चू कडूंची भाजपवर टीका
ते म्हणाले, आम्ही पहिली निवडणूक लढवली होती ती फार कठीणाईची होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यातच आम्हाला कोणत्याही जातीचा धब्बा लागू द्यायचा नव्हता. अशा कठीण परिस्थितीत आम्ही निवडणूल लढवली होती. आता मी आंदोलन करतो. कारण काही गोष्टी जीवंतपणा आणण्यासाठी त्या कराव्या लागतात. प्रत्येक गोष्टीवर अंकून ठेवणे गरजेचे असते. कारण प्रशासनावर जोपर्यंत अंकूश नसतो, तोपर्यंत सरकार सर्वसामान्य जनतेशी निट वागत नाही. त्यामूळे आमची आंदोलनाची भूमिका ठाम आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
हे पण वाचा, परभणीला सक्षम पालकमंत्री हवा, बच्चू कडूंच्या पक्षाची मागणी
येणारी परिस्थिती पाहूनच शाळांबाबत निर्णय घेतला पाहिजे. शिक्षण नंतर पूर्ण करता येऊ शकतं, पण जीव पहिला महत्त्वाचा. सरकारचं पहिलं प्राधान्य आरोग्यावर आहे. त्यामुळे सगळ्या पालकांनी, विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही आंदोलनाचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे माझ्याकडे मंत्री पद असले तरी मी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सतत आंदोलन करीत राहिल असे बच्चू कडू यांनी सांगितले.
Read Also :
- अहमदनगर महापालिका महापौर निवडणुकीत शिवसेना ‘गॅसवर’ तर काँग्रेस ‘फ्रंटफूटवर’
- अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी
- निवडणुकीत पत्ता कट केलेल्या भाजपच्या मेधा कुलकर्णींचे अखेर राजकीय पुनर्वसन
- “कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता एकतर्फी होणार”, डॉ. अतुल भोसलेंची वाळव्यात गर्जना
- राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; संजय राऊत म्हणतात…