मुंबई : आधीच नोकरी नाही. त्यात मरमर करून परीक्षेचा अभ्यास केलाय. त्यातही परीक्षेच्या केंद्राबाबत प्रवेश पत्रावर माहिती नाही. दोन आणि तीन हजार रुपये खर्च करून बीडवरून पुण्याला आलोय साहेब… तुम्ही अशी वेळेवर परीक्षा रद्द केली. साहेब…आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहोत. आमच्यासाठी १०० रुपयेही जास्त आहेत. उद्धव ठाकरे साहेब…शेतकऱ्यांच्या मुलांशी असं खेळू नका हो…या संतप्त भावना आहेत, बीड ते पुणे असा सहा तास प्रवास करून आरोग्य विभागाची परीक्षा द्यायला आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या.
तुम्ही फक्त परीक्षा रद्द नाही केली साहेब तुम्ही विद्यार्थ्यांच्या मनात आता हे नक्की समजावून दिलं की ठाकरे सरकार आणि मी राजेश टोपे आम्हाला भरती घेता यात नाही.. आम्ही फक्त पैसे घेऊनच काम करतो😡 गरिबाच लेकरू ५०० कि. मी. ला जाऊन आता घरी जातंय.. त्याची माय १५०₹ रोजान शेतात जाती 🙏😡
— akshay_jayhind (@GhugeAkshayM1) September 25, 2021
आरोग्य विभागाची परीक्षा प्रवेश पत्रामुळे आधीपासूनच चर्चेत होती. अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर केंद्राचे नाव नव्हते, तर कोणाच्या प्रवेश पत्रावर शहराचे नाव नव्हते. तरीही विद्यार्थी परीक्षा देण्यास पोहोचले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता न्यासा कम्युनिकेशनने परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर उमेदवारांच्या हिताचा विचार करत कोणाचेही नुकसान होऊ नये म्हणून गट क मधील जागांसाठीसाठी २५ सप्टेंबर रोजी होणारी आणि गट ड मधील जागांसाठी २६ सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. पण, यामुळे विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागलाय.
आघाडीच्या महागोंधळाचा उच्चांक. आरोग्य विभागाची उद्या होऊ घातलेली परिक्षा रात्री १० वा. मेसेज पाठवून रद्द केली. बरेच जण परीक्षेच्या ठिकाणी पोहचले सुद्धा आहेत. या मनस्तापाची आणि देव न करो पण कोणी स्वप्नील सारखं टोकाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री घेणार की आरोग्यमंत्री? pic.twitter.com/7ENoXgEP2V
— Shweta Mahale Patil- श्वेता महाले पाटील . (@MLAShwetaMahale) September 24, 2021
‘आरोग्य विभागाच्या भरतीसाठी २०२० पासून टेंडर काढलं होतं. त्यामध्ये पाच कंपन्या होत्या. मात्र, पाचवी कंपनी न्यासाची निवड केली होती. पण, ही कंपनी आधापासूनच ब्लॅक लिस्टमध्ये आहे. मग ब्लॅक लिस्ट कंपन्या निवडते कोण? तुम्ही ब्लॅक लिस्ट कंपन्या निवडून भ्रमनिरास करताय. महा-आयटीचे कारभार पाहणारे सतेज बंटी पाटील हा घोळ कोणी घातलाय?’ असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी ‘साम टीव्ही’सोबत बोलताना उपस्थित केलाय.
आरोग्य विभागाच्या वर्ग क व ड वर्गातील विविध पदांसाठी दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी.https://t.co/ghC8xrgOzu
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 24, 2021
साहेब…मी चार तास खर्च करून गडचिरोलीवरून नागपूरला आलो. रात्री ७ वाजता नागपूरला पोहोचलो. राहायचं कुठे हा प्रश्न होता. पण, ती सोय केली आणि ऐनवेळी परीक्षा रद्द केल्या. मी गरीबाचा मुलगा आहे. माझे आर्थिक नुकसान झाले, ते आता कोण भरून देणार? असा सवाल आरोग्य विभागाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याने उपस्थित केला.
Read Also :
- दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- …तर ‘मातोश्री’ हे जेल म्हणून घोषित करायचं ठरलं होतं; छगन भुजबळांचा धक्कादायक खुलासा
- अनिल परब गोत्यात येणार? चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहा, ED ने बजावला पुन्हा समन्स
- राज्यात तिघाड अन् वॉर्डात बिघाड; बहुसदस्यीय प्रभागरचनेमुळे उडाली इच्छुकांची झोप
- मोठी बातमी: झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यास नकार; आयोगाने आदेश धुडकावला