मुंबई : आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गासाठी होणारी 25 आणि 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली. आज होणारी परीक्षा रद्द झाल्याची माहिती, विद्यार्थ्यांना ऐनवेळी काल रात्री मेसेज आणि मेलद्वारे कळवण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आयटी कंपनीकडे बोट दाखवलं आहे. तसंच झाल्या प्रकारामुळे दिलगिरी व्यक्त केली आहे.
लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका; अजित पवारांनी कंत्राटदारांना भरला दम
दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांकडे 5, 10 ते 15 लाख रुपयांची मागणी करुन, भरती करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द का झाली याची तर चौकशी व्हायलाच हवी, पण या दलालांचाही शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका; अजित पवारांनी कंत्राटदारांना भरला दम
आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतं परीक्षा रद्द झाली, या सरकारचा घोळ काही समजत नाही. प्रवेश पत्र यूपीमधलं मिळतं. सगळंच कन्फ्युजन आहे, काही दलाल मार्केटमध्ये आलेले आहेत, या पदांसाठी त्यांच्यापासून 5 लाख, 10 लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, हे गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं, विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींना ‘तो’ निर्णय थांबवण्यास भाग पाडणार का?
या प्रकरणाची 100 टक्के चौकशी व्हावी, हे दलाल कोण आहेत ते समोर आलं पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात आहेत त्याची चौकशी व्हावी. परीक्षा रद्द होण्यासाठी कोणीही घोळ केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, सर्वत्र घोळच घोळ सुरु आहे, या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का? हा दलालीचा नवा अध्याय सुरु होईल, परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे? याची चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Read Also :
- …तर ‘मातोश्री’ हे जेल म्हणून घोषित करायचं ठरलं होतं; छगन भुजबळांचा धक्कादायक खुलासा
- अनिल परब गोत्यात येणार? चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहा, ED ने बजावला पुन्हा समन्स
- राज्यात तिघाड अन् वॉर्डात बिघाड; बहुसदस्यीय प्रभागरचनेमुळे उडाली इच्छुकांची झोप
- मोठी बातमी: झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यास नकार; आयोगाने आदेश धुडकावला
- खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात, रस्त्याची कामे नीट करा – एकनाथ शिंदे