औरंगाबाद : मुस्लिम आरक्षणावरून आज पुन्हा एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी,काँग्रेस आणि शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच यावेळी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे सरकारने मुस्लिम आरक्षणाची घोषणा केली तर एमआयएम महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणार नाही अशी मोठी घोषणा जलील यांनी केली आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानपरिषद निवडणुकीत कोण मारणार विजयाचा चौकार? उद्या मतमोजणी, उमेदवारांची उत्सुकता शिगेला
यावेळी बोलताना जलील म्हणाले की, एमआयएमने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उचलताच विरोधक टीका करत आहे की, आम्ही निवडणूक आल्याने हा मुद्दा उचलला. त्यामुळे आमचं ठाकरे सरकारला आव्हान आहे की, त्यांनी मुस्लिम आरक्षण द्यावे, एमआयएम आगामी महानगरपालिका निवडणूका लढवणार नाही”
“ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात”
तसेच सरकारने अजूनही मुस्लिम आरक्षण जाहीर केलं नाही तर, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आम्ही विधानभवनावर धरणे आंदोलन करू, असा इशारा जलील यांनी दिला आहे. आता जलील यांची ऑफर ठाकेर स्वीकारणार का, आगामी काळात ठाकरे सरकार मुस्लिम आरक्षणाची घोषणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जलील यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात मुस्लिम आरक्षणावरून राजकीय वातावरण आणखी पेटण्याची शक्यता आहे.
Read Also :
- “जितेंद्र आव्हाड साहेब, जमत नसेल तर..मंत्रिपद सोडा”; संभाजी ब्रिगेडचा सल्ला
- सचिन सावंत धावले राऊतांच्या मदतीला; शब्दकोशातील ‘त्या’ शब्दाचा अर्थ दाखवला..
- भाजप आमदाराच्या वाढदिवसाला एकनाथ खडसेंची हजेरी, राजकीय चर्चेला उधाण..!
- अजित पवारांची ऑफर; राष्ट्रवादीला निवडून द्या 100 कोटी देतो…!
- किरीट सोमय्यांच्या रडारवर आता महाविकास आघाडीतील ‘हा’ नेता..