पुणे : कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी व कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे, खासगी व शासकीय असा भेद न करता दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, बिबिटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा व्हावा. पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून नुकसान भरपाई तातडीने मिळावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित स्वरपाचे शैक्षिण कर्ज धोरण लागू करावे, या मागण्यांसाठी खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. किल्ले शिवनेरीपासून सुरू झालेला मोर्चा पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चा दरम्यान अमोल कोल्हे ठिकठिकाणी सभा घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल करतांना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता विकसित भारत संकल्प यात्रेचे संयोजक सुदर्शन जयप्रकाश चौधरी यांनी अमोल कोल्हे यांना एक पत्र लिहिलं आहे.
सुदर्शन जयप्रकाश चौधरी यांनी अमोल कोल्हे यांना लिहिलेलं पत्र
मा. अमोल कोल्हे साहेब,
खासदार,
शिरूर लोकसभा
महोदय,
प्रथमत आपले आभार कारण आपण तब्बल निवडणूकपूर्व आचारसंहिता लागू व्हायला ३ महिने बाकी असताना आता मतदारसंघात पूर्ण वेळ दौरे करत आहात. आपली निष्क्रियता सिद्ध झाली असताना आपण पुढील लोकसभेसाठी किती पात्रतेचे उमेदवार आहात हे दाखवण्याची उठाठेव ही खरोखर जनतेने न ओळखावी इतकी येथील लोक दूधखुळी नाहीत. असो तुम्ही काय करावे यावर मी बोलले तर तर तुमची पदाची गरीमा राहणार नाही. इतके कौतुकास्पद काम तुम्ही मतदारसंघात केले आहे. पत्र लिहण्याच्या मुळ मुद्द्यावर मी येतो आहे. मोदी सरकारच्या योजना फसव्या आहेत .हे तुमचे बेजबाबदार स्टेटमेंट मी प्रसारमाध्यमाच्या मार्फत ऐकले. मुळात कोणत्याही सरकारने योजना या त्यांचे घर भरण्यासाठी नव्हे तर जनतेच्या कल्याणासाठी आणलेल्या असतात. याची आपल्याला कल्पना नसावी. सध्या तुम्ही ज्या आघाडीचे समर्थन करत आहात. त्यांच्या काळात किती भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली आणि मोदी सरकारच्या काळात किती प्रकरणे बाहेर निघाली.याची तुलना केली तर मोदी सरकारचा पारदर्शक कारभार आहे समजून येईल.
हेही वाचा…पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ; दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
योजनांना फक्त कुटुंबाची नावे न देता सामान्य जनतेपर्यंत योजना पोहचविण्याचे काम मागील दहा वर्षांत मोदी सरकारने केले आहे. तुमच्यासारख्या निष्क्रिय खासदाराने जगभरात मोदींची प्रतिमा उंचावली असताना बोलणे म्हणजे सुस्पष्ट बोलघेवडेपणा आहे. तुमचे पक्षीय पदाधिकारी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ पळवून लावत असताना सामान्य जनता त्या रथाला विरोध करत आहे. असे तुम्ही स्टेटमेंट लाजिरवाणे आहे. कारण माझ्याकडे आपल्या मतदारसंघात शेकडो लोकांचे रथाकडून माहिती समजून घेतानाचे फोटो आहेत. आपण माझ्या आणि इतर सहकारी यांच्या सामाजिक माध्यमातील फोटोवरून तुमच्या लक्षात येईल. मोदी सरकारच्या योजना फसव्या आहेत. असे तुमचे मत असेल तर विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून किती परिणाम शेवटच्या घटकापर्यंत झाला आहे. याचा डेटा मी तुम्हाला सादर करतो. त्याच्या परिणामाकरते विरोधात आपण देखील आपले स्पष्टीकरण उथळ पद्धतीने न मांडत डेटा सोबत मांडावे. सदर स्पष्टीकरण आपण देऊ शकला नाही तर खासदारकी लढवणार नाही असा पण चंग तुम्ही घ्या. म्हणजे तुमची खरखुरी सक्रियता जनतेच्या लक्षात येईल. आमचे चॅलेंज तुम्ही स्वीकाराल ही एक मतदार म्हणून आमची अपेक्षा..
हेही वाचा…काँग्रेस आज लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, नागपुरात जाहीर सभा, ४५० जणांसाठी तीन भव्य व्यासपीठ
शेवटचा मुद्दा शेतकरी कुटुंबातील मी देखील आहे. कांदा पिकाच्या प्रक्रिया आणि साठवणूक उद्योगात काम व्हावे याकरिता मोदी सरकारने जेवढे प्रयत्न केले तेवढे तुमच्या बिघाडी सरकारच्या काळात झाले का तपासा. शेतकरी वर्गाबद्दल सहानुभूती असणे स्वाभाविक आहे पण त्याबद्दल पॉलिसी लेव्हलला एखादा रिपोर्ट आणि त्याचा फॉलोअप लोकप्रतिनिधी म्हणून आपण सादर करायला हवा होता. यातल तुम्ही काहीच करू शकला नाहीत कारण १८०० दिवसांपैकी किती दिवस मतदारसंघातील शेतकरी प्रश्र्न समजून घेण्यासाठी आपण काम केलेत हे सांगावे आणि मग फुसक्या यात्रा काढाव्यात. सदर यात्रा सहकारी कारखाने बंद केलेल्या लोकप्रतिनिधी यांच्या दारासमोर कराव्यात त्यात आम्ही देखील सहभागी होऊ. खासदार साहेब तुम्ही जनतेची फसवणूक जास्त काळ करणे आता तेवढे सोपे नाही. अभिनेता होण सोप आहे नेता व्हायला कस लागतो.
-सुदर्शन जयप्रकाश चौधरी
संयोजक – विकसित भारत संकल्प यात्रा
READ ALSO :
हेही वाचा..“रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ‘नागपुर’ ही संघभूमी नाही तर दिक्षाभूमी बनवणार”,कन्हैया कुमारांनी नागपुरातली सभा गाजवली
हेही वाचा…राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! ‘या’ विषयावर झाली ४० मिनिटे चर्चा
हेही वामहेश लांडगे समर्थक विजय फुगेंचा ‘डीपीडीसी’मध्ये बंडाचा झेंडा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अखेर माघार
हेही वाचा...महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ; कुणाला कुठे आणि किती जागा मिळणार ? पाहा संपुर्ण यादी
हेही वाचा..एकनाथ शिंदे ‘ठाण्याचा वाघ’ तर देवेंद्र फडणवीस ‘फ्रायर ब्रॅण्ड’ नेते ; कुणी उधळली स्तुतीसुमने ?