मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी एक ट्विट करत म्हटलं होतं की ‘सरकारी पाहुणे घरी येणार’, यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं, जर आपण घोटाळा केला असेल, पुणे वक्फ बोर्डाचा… जमिन घोटाळ्यात आपले नाव असेल तर आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार नाही तर आपल्यालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार. सोमय्यांनी केलेल्या या ट्विटनंतर नवाब मलिकांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पुढील आठवड्यात एका भाजप नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा भाजप नेता कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
३०० ते ४०० गाड्यांचा फौजफाटा घेऊन एमआयएम धडकणार मुंबईमध्ये
नवाब मलिक म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून ईडीचे अधिकारी पत्रकारांना माहिती देत आहेत की, नवाब मिलकांच्या घरी छापेमारी होणार आहे. आज किरीट सोमय्या बोलत आहेत की, पुण्यातील वक्फ बोर्डाच्या संदर्भात ईडी नवाब मलिकांच्या घरी जाणार… ईडीला घरी य़ेण्याची गरज नाही, मी स्वत: त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी तयार आहे.
आमच्या घरी लवकरच सरकारी पाहुणे येणार आहेत; मलिकांच्या ट्विटने पुन्हा खळबळ
नवाब मलिक पुढे म्हणाले, ज्या प्रकारे ईडी बातम्या प्रसारित करण्याचं काम करत आहेत. पुण्यातील वक्फ बोर्डाच्या जागेसंदर्भात आम्ही एफआयआर केली होती. तेथे ईडीचे अधिकारी गेले तपास सुरू केला आणि मीडियात बातम्या पेरल्या की वक्फ बोर्डाच्या सात कार्यालयांवर छापेमारी केली. त्याच दिवशी आम्ही स्पष्ट केलं की, वक्फ बोर्डावर कुठल्याही प्रकारची छापेमारी झालेली नाहीये. त्यांना कुठलाही तपास करायचा असेल तर आम्ही सर्व कागदपत्रे देण्यास तयार आहोत.
पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची ताकद अजिबातच नाही; अजित पवारांनी डिवचलं
माझी माहिती आहे की, दोन दिवस एका वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला बोलवण्यात आलं आणि त्याला सांगितलं तुम्ही एफआयआरचं चुकीचा केला आहे. ज्यांनी सात कोटी रुपये लुटले त्यांची शिफारस करम्याचं काम ईडीचे अधिकारी करत आहेत असंही नवाब मिलक म्हणाले.
Read Also :
- स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे आरोप – गोपीचंद पडळकर
- शिवसेनेचा कारनामा: सरकारी कामात अडथळा, तीन माजी नगरसेवकांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
- एमआयएमच्या रॅलीला मुंबईमध्ये प्रवेश मिळणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- भाजप आमदाराच्या वाढदिवसाच्या बॅनरवर खडसेंचा फोटो; जळगावच्या राजकारणात उडाली खळबळ
- ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले, मुंबईत कलम 144 लागू; रॅली आणि आंदोलन करण्यास मज्जाव