मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचं राज्यशासनात विलीनीकरण करा ही मागणी घेऊन राज्यभरातील ST कर्मचाऱ्यांनी सध्या आंदोलन करत आहेत. यासाठी समिती स्थापन करून त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र तरीही कर्मचारी आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत. त्यानंतर आता एसटी महामंडळाकडून कठोर कारवाईची भूमीका घेण्यात आली आहे. महामंडळाने संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात निलंबनाच्या कारवाईला सुरूवात केली आहे.
मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? आर. आर. पाटील यांच्या लेकीची भावूक पोस्ट व्हायरल
एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात संप सुरू आहे. याविरोधात आता एसटी महामंडळाने मोठी कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार महामंडळाने संपावर गेलेल्या ३७६ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. यामध्ये राज्यातील ४५ आगारातील कर्मचाऱ्यांचा समावेळ आहे. राज्य सरकारने जीआर काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन बेकायदेशीर, कर्मचाऱ्यांनी आर-पार’ची लढाई करू नये – अनिल परब
दरम्यान, एसटी महामंडळ उद्या सकाळी 10 वाजता संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. महामंडळाने देखील आता कर्मचाऱ्यांविरोधात कठोर भूमीका घेतली असून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. तांत्रिक कारणांमुळे आज कागदोपत्री प्रक्रीया पूर्ण होऊ न शकल्यानं उद्या ही याचिका दाखल करण्यात येणार आहे.
Read Also :
- महाविकास आघाडीतील नेते घरात घेण्याच्या लायकीचे नाहीत, त्यांनी बिग बॉसमध्ये जावं – राणे
- आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर फेकले ऑईल; सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवलं
- अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय; प्रकाश आंबेडकरांचा रोख नेमका कुणाकडे?
- विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर; 10 डिसेंबरला मतदान होणार
- देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध; उद्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार – नवाब मलिक