मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, त्यावेळी एकाही शिवसेनेच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री पद घेणं. हे कसले निष्ठावंत आहेत. ? असा सवाल संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनिल राऊत यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी बंडखोर आमदारांना इशारा देखील दिला आहे.
“शिवसेनेवर टीका करताना विरोधकांनी विचार करावा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत शिवसेना विधानसभेच्या निवडणुकीत लढली. त्यामुळे हा पक्ष फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा आहे. बंडखोर आमदारांनी नाटक नौटंकी बंद करावी, त्यामुळे गद्दारी करून जी सत्ता मिळवली आहे. त्यामध्ये तुम्ही खुश राहा. आम्ही इकडे आनंदी आहोत. पक्ष वाढवत आहोत. असंही ते म्हणाले.
“एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढावा, नाही तर उद्या भाजप तुमच्यावर संकट आणेल”
महाराष्ट्रातील जनतेचं उद्धव ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम आहे. तसेच आगामी काही काळात उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी बसवणार आणि ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं त्यांचा आम्ही सुड घेणार ?असा इशारा देखील सुनिल राऊत यांनी दिला आहे. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील प्रखर शब्दात टिका केली आहे.
“शिवसेनेने देखील असाच विश्वासघात केला होता, म्हणून आम्ही सेना फोडली” भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकऱणी इडीने अटक केली आहे. त्यांची आता 22 ऑगस्टपर्यंत इडी कोठडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या संपादकपदी आता उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Read also
- नितीश कुमारांनी वावटळ निर्माण केलंय, त्याच वादळात रूपांतर झालं तर..; शिवसेनेचा भाजपला इशारा
- “केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपसोबतची युती तोडणार”?
- “अतिवृष्टीग्रस्तांच्या राज्य सरकारने तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय फक्त”; अजित पवारांची सडकून टिका
- वाढदिवस शिवसेनेच्या आमदाराचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या आमदाराची
- “तात्काळ बैठक बोलवा, अन्यथा लढा उभारावा लागेल”; संभाजीराजेंचा शिंदे सरकारला इशारा