मुंबई : सत्तांतर फितुरांचा जो गेम आहे, काय आहे हे महाराष्ट्राला समजावुन सांगणे ही आगामी काळातील शिवसेनेची जबाबदारी आहे. शिवसेना ही कायम 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करत आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारचा येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा असा कारभार सुरू आहे, असा टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर लगावला आहे.
“55 पैकी 40 आमदार व 18 पैकी 12 खासदार, त्यामुळे दसरा मेळावा आम्हीच घेणार”; शंभुराज देसाई
बंडखोरी करणाऱ्यांनी मिळवलं तरी काय. दादा भुसे यांनी कृषी खातं काडून घेण्यात आलं. पण ज्यांना आता कृषी खातं मिळालं आहे. त्याला हेक्टर आणि एकर मधला फरक कळत नाही. ज्याला खुरपं, कुळव, कुदळ यातला फरक कळत नाही असा माणुस तिथं दिला आहे. आरोग्य मंत्री असा केलाय ज्याला हत्तीपाय रोग डासांनी होतो का दुषित पाण्याने होते हे कळत नाही. म्हणजे येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा असा कारभार सुरू आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
श्रीकांत शिंदेंवर सोपवणार मोठी जबाबदारी?; आदित्य ठाकरेंचं पद जाणार
या सगळ्यात जनतेचे प्रश्न कुठे आहेत. अधिवेशनाच्या दरम्यान सुभाष देशमुख या शेतकऱ्याने जो आत्मदहनाचा प्रयत्न केला. याबाबत विरोधीपक्षनेचते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी उत्तरे दिली, अशी टीका करत. उपमुख्यमंत्री उत्तरे देत असताना म्हणाले की तो फक्त 10 ते 15 टक्के भाजलेला आहे. परंतु तो त्याच दिवशी तो 45 टक्के जळालेला होता. काल त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे, असही अंधारे म्हणाल्या.
“माझ्या जिल्हा प्रमुखांविरोधात निवडून दाखवा”; शहाजी बापुंना शिवसेनेचे ओपन चॅलेंज
भाजपच्या विरोधात बिहारमध्ये, दिल्लीमध्ये, पश्चिम बंगालमध्ये हे जे ऑपरेशन लोट्स चाललेलं आहेत. सत्तेच्या गौरवापरात जे काही प्रयत्न चालु आहेत. यामुळे सर्वसामान्या माणसाच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. काल पर्यंत भावना गवळी किरीट सोमय्या यांना माफिया वाटत होत्या. मात्र त्या त्यांच्या 40, 45 वर्षात कधी पंतप्रधानांना भेटल्या नसतील त्या अचानक मोदींना राखी बांधतात. ज्यांना चप्पल ने मारायची भाषा केली होती ते अचानाक कर्तव्यदक्ष मंत्री वाटायला लागतात, अशी टिका सुषमा अंधारे यांनी भाजपवर केली आहे.
Read also
- “उद्धव ठाकरे साधा सरपंच देखील होण्याच्या लायकीचा माणूस नाही”; राणेंची जहरी टिका
- “मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
- अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास
- अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास
- “मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं