मुंबई : सालाबादाप्रमाणे याही वर्षी आम्ही गणपती घरी आणलं असून पाच दिवस आमच्या घरी आनंदाचं वातावरण राहतं. त्यानंतर आम्ही कोकणात जात असतो. परंतु महाराष्ट्रात जे काही विघ्न आलं होतं. ते आता टळलं असून आता राज्यात विकासाकडे वाटचाल सुरू असल्याची अपेक्षा करतो. असं मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं. मुंबई येथील जुहू निवासस्थानी त्यांनी आज गणपतीची स्थापना केली. त्यावेळी ते बोलत होते.
श्रीकांत शिंदेंवर सोपवणार मोठी जबाबदारी?; आदित्य ठाकरेंचं पद जाणार
छत्रपतींच्या महाराष्ट्रात कुणावर अन्याय होणार नाही. तसेच सुशांत सिंह, दिशा सालिनी यांना ठार मारण्यात आलं. पंरतु आता अत्याचार करणाऱ्यांना आताच सरकार सोडणार नाही. तसेच या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करतील अशी शक्यता आहे. तसेच सगळ्या गोष्टी बापाच्या चरणी वाहून चालत नाही त्यासाठी आपल पण काही कर्तृत्व लागतं असंही नारायण राणे म्हणाले. त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी हे विधान केलं आहे.
“माझ्या जिल्हा प्रमुखांविरोधात निवडून दाखवा”; शहाजी बापुंना शिवसेनेचे ओपन चॅलेंज
ज्यांच्या हातात मुंबई महापालिका २५ वर्ष ताब्यात होती त्यांनी बकाळ मुंबई तयार केली आहे. तसेच यांनी मुंबईच्या विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांची गणपती येण्याअगोदर सत्ता गेली आहे. येणाऱ्या काळात भाजपचे नेतृत्व कुणाकडे असू द्या. परंतु मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा लावू असा दावा देखील नारायण राणे यांनी केल आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अपमानित अशा रित्याने कोणत्याही मुख्यमंत्र्यांना काढलं नाही. मंत्रालयात फक्त ३ तास गेले असून सर्व दिवस त्यांनी मातोश्रीवर बसून काढले.
“एकनाथ खडसेंचं वय झालं आहे म्हणून आम्ही त्यांना दुर्लक्ष करतोय”; खडसेंविरोधात मोठा गौप्यस्फोट
दरम्यान, उद्धव ठाकरे संरपंच देखील होऊ शकत नाही. ते त्यांच्या लायकीचा माणूस देखील नाही. अशी घणाघाती टिका देखील नारायण राणे यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्य माणसांसाठी काहीच केलं नाही. त्यांनी जे काही केलं ते फक्त मातोश्रीसाठी केलं होतं. त्यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत जनता योग्य तो धडा शिकवणार आहे. असंही नारायण राणे म्हणाले.
Read also
- “मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
- अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास
- अन् चंद्रकांत पाटील अडकले गर्दीत, मोटारसायकलवरून पुण्यात केला प्रवास
- “मातोश्रीच्या अंगणात सुख, शांती लाभावी”; बंडखोर आमदाराचं गणपतीला साकडं
- “55 पैकी 40 आमदार व 18 पैकी 12 खासदार, त्यामुळे दसरा मेळावा आम्हीच घेणार”; शंभुराज देसाई