अहमदनगर : राज्यात कोणतीच कामे झालेली नाहीत. जुन्या कामांवरूनच भांडणे सुरू आहेत. कोणत्या कामाला कोणाचे नाव द्यायचे? ह्यांचे द्यायचे, की त्यांच्या वडिलांचे, असेच सुरू आहे. कोणत्या कामात किती कमिशन घ्यायचे? बदल्यांमध्ये पैसे खायचे, एवढेच सुरू आहे. त्यामुळे, राज्याचे होणारे नुकसान खूप मोठे आहे, राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्डच मोडले आहे, असा गंभीर आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. राळेगणसिद्धीत ते माध्यमांशी बोलत होते.
वीर सावरकरांबद्दल जो वाद झाला तो दुर्दैवी, त्यांना मराठी माणूस विसरू शकत नाही – शरद पवार
महाजन म्हणाले, ‘‘राज्यात सध्या मोठ्या चौकशा व भानगडी सुरू आहेत. भ्रष्टाचाराला तर कोणतीच मर्यादा शिल्लक राहिली नाही. या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडून काढले. एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या महिनाभरापासून मिटवता येत नाही, हे सरकारचे अपयश आहे. आम्ही सत्तेत असताना मराठा समाज आंदोलन, ओबीसी आरक्षण मुद्दा, नाशिक येथून निघालेला लाल बावट्याचा मोर्चा, प्रतिभा शिंदे यांचे आंदोलन, असे विविध मोर्चे, आंदोलने राज्य सरकारविरोधात झाले. मात्र, सरकार म्हणून आम्ही त्यांना भेटत होतो.
‘ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळू शकतं’; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला तोडगा
राज्यातील अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये बसावे लागले आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले सनदी अधिकारी कुठे आहेत? अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत, मात्र कोणावरही कोणतीच कारवाई अथवा त्यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत नाही. १९९५ मध्ये आमचे सरकार सत्तेवर असताना, मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी तत्काळ राजीनामे दिले, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.
Read Also :
- शिवसेना गोव्यात स्वबळावर तर उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत युती करणार?, संजय राऊतांनी केले स्पष्ट..
- श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवलंय – प्रकाश आंबेडकर
- कोरोनाच्या नावाखाली बिळात बसलेल्या वाघानं आता तरी बाहेर यावं – सदाभाऊ खोत
- …म्हणून शिवेंद्रराजे भोसलेंचा अध्यक्षपदावरून पत्ता कट झाला; शशिकांत शिंदेंनी सांगितले कारण
- एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार, पण…: अनिल परबांनी टाकली ‘ही’ अट