अहमदनगर : विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांच्या विरोधात महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. यातच आता अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे दक्षिण अहमदनगरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच निलेश लंके यांनी प्रसंगी तुतारी किंवा मशाल हाती घेऊन महाविकास आघाडीकडून निवडणुक लढवावी, अशी इच्छा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…नवनीत राणांच्या समोर अडचणींचा डोंगर, भाजपमध्ये करणार प्रवेश, तारीख अन वेळही ठरली
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा याआधी निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर निलेश लंके यांच्या पत्नी राणी ताई लंके यांच्या नावाचीही सध्या नगर लोकसभा मतदारसंघातून जोरदार चर्चा सुरू आहे. तशी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. यातच आज सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने लंके यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी लंके यांनी महाविकास आघाडीकडून निवडणुक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
संभाजी कदम यावेळी म्हणाले की, येणाऱ्या लोकसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडे निलेश लंके साहेबांनी यावं. आज जरी दुसऱ्या गटात असले तरी त्यांनी महाविकास आघाडीकडे यावं. प्रसंगी तुतारी किंवा मशाल हाती घेऊन निवडणुक लढवावी. प्रसंगी दक्षिणेचा जो भाग आहे. दक्षिणेतला उमेदवार असावा अशी आमची भूमिका आहे.
हेही वाचा…“सत्ताधारी पक्षातील अकरा साखरसम्राटांवर तब्बल १२०० कोटी रुपयांची खैरात, मात्र पंकजा मुंडेंवर पुन्हा अन्याय
दरम्यान, दुसऱ्या बाजूला सुजय विखे पाटील आणि निलेश लंके असा मागच्या निवडणुकीत सामाना बघायला मिळाला होता. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा वारंवार पराभव झाला आहे. २००४ साली राष्ट्रवादीने तुकाराम गडाख यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचाही याठिकाणी पराभव झाला. त्यानंतर २००६ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाला. ही जागा राष्ट्रवादीतल्या गोटातली असली तरी २००९ पासून वारंवार या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला.
२००९ मध्ये राष्ट्रवादीकडून शिवाजी कर्डिले यांचा भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी पराभव केला. तर २०१४ साली भाजपने पुन्हा दिलीप गांधी यांना उमेदवारी देत राष्ट्रवादीच्या राजीव राजळे यांना पराभवाची धुळ चारली. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला होता.
READ ALSO :
हेही वाचा…“सगळ्या पक्षाला संपवून फक्त एकट्या भाजपला जिवंत राहायचं आहे का ?” कोकणाच्या जागेवरून भाजप अन् शिंदे गटात जुंपली
हेही वाचा…“शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची दलित युवकास बेदम मारहाण”, विरोधकांचा संताप, कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…भाजपची मॅरेथॉन बैठक, लोकसभेच्या १०० जागा ठरल्या, उमेदवारही जाहीर, मोदींसह, शाह मैदानात
हेही वाचा“नादाला लावलेली माणसं फार काळ राहत नाहीत”, संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…प्रति, महायुती सरकार, पत्रास कारण की…., विरोधकांनी महायुती सरकारला लिहिले पत्र, अनेक गोष्टींचा उल्लेख