मुंबई : बारामती येथील महारोजगार मेळाव्यासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भोजणासाठी आमंत्रण पत्र लिहिलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री पत्र लिहून नकार कळवला. त्याआधी अजितदादांनी आपली भूमिका पत्राद्वारे जनतेला कळवली. यातच आज मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात विधीमंडळाच्या लॉबितच धक्काबुक्की झाल्याचे बघायला मिळालं. या सर्व गोष्टी घडत असतांना आता विरोधकांनी महाराष्ट्र राज्य विधिमंडळ म्हणून महायुती सरकारला पत्र लिहिले आहे. ते पत्र आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या ट्विटवर शेअर केले आहे.
हेही वाचा…शिंदे गटातील दोन आमदार विधीमंडळाच्या लॉबीतच भिडले, दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की
शरद पवार गटाने शेअर केलेले ट्विट जशाच्या तसं
पत्रास कारण की…
प्रति, महायुती सरकार…
स.न.वि.वि.
सन्माननीय आमदारांनो… मी विधिमंडळाची इमारत बोलतेय… आजवर मी अनेक सरकारं पाहिलीत…. पण माझा अवमान करणारं सरकार पहिल्यांदाच पाहतेय. तुम्ही मला या महाराष्ट्राच्या लोकशाहीचं एक पवित्र स्थान म्हणता. पण आज हेच स्थान कलुषित झालं. जेव्हा सत्ताधारी पक्षातलेच आमदार आपापसात माझ्या आवारात भिडू लागले. महाराष्ट्राने मोठ्या आशेने तुम्हाला निवडून दिलं. फोडाफोडीचं राजकारण करून असंविधानिकपणे तुम्ही सत्तेतही आलात. पण कै. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या आदर्श राजकीय परंपरेला काळीमा फासण्याचं काम तुम्ही केलं. माझ्या भिंतींनाही महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचा स्वाभिमान आहे. सबंध महाराष्ट्र मोठ्या आशेनं माझ्याकडे पाहतो. पण जेव्हा रस्त्यावरचं गँगवॉरच माझ्या आवारात घडतं, तेव्हा गेली अनेक वर्ष बाळगलेल्या माझ्या स्वाभिमानालाच तडा जातो. महाराष्ट्राच्या जडणघडणीची साक्ष म्हणजे मी आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण बदलाचे निर्णय झाले ते माझ्याच आवारात….
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
मग तो महिला सक्षमीकरणासाठी ३३ टक्के आरक्षणाचा असो की वडिलांच्या मालमत्तेत मुलीला समान अधिकार देण्याचा…. मग तो लाखो रोजगार उपलब्ध करून देणारा एमआयडीसी निर्माणाचा असो की, आयटी पार्कचा…. मग तो सर्व शिक्षा अभियानाचा असो की, व्यावसायिक शिक्षणाचा, दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी फोर्स वनच्या स्थापनेचा असो की, महाराष्ट्र जलसिंचनाने सुजलाम सुफलाम करण्याचा, शेतकरी समृध्दीचा की डान्सबार बंदीचा असे कित्येक सर्वसमावेशक हिताचे निर्णय घेतले गेले ते माझ्याच आवारात. पण आजचं सरकार निर्णय घेतंय ते आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर, दिल्लीच्या आणि गुजरातच्या हितासाठी.
विधिमंडळ म्हणून मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे पण तुम्ही सत्तेवर आलात आणि माझ्याच आवारात कार्यरत आहात ते स्वतःच्या मंत्रीपदाचे, खुर्चीचे आणि सत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी. माझ्याच आवारातल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जाऊन आपण अभिवादन करता, पण इमारतीत येऊन मात्र गँगवॉर करता! आज भर अधिवेशनादरम्यान महायुतीच्या आमदारांमध्ये झालेली बाचाबाची पाहिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब व सुप्रसिध्द दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या तत्कालीन उपपंतप्रधान यशवतंराव चव्हाणांसोबतच्या भेटीची गोष्ट सांगाविशी वाटते. त्यावेळी कै. चव्हाण साहेब जब्बार पटेल यांना म्हणाले.
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
“जब्बार फार मुश्किलीने या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यासाठी अनेक लोकांचे बळी गेलेत. विधानसभेत जे काम चालतं ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानानुसार चालतं. त्या सभागृहाला एक ‘डिग्निटी’ असते. जेव्हा तुम्ही सिनेमा कराल तेव्हा सभागृहाची डिग्निटी विसरू नका.” जब्बारांनी रिल्स लाईफच्या माध्यमातून ही ‘डिग्नीटी’ जपली. परंतु तुम्ही सत्ताधा-यांनी रिअल लाईफमध्ये ‘माझी’ डिग्नीटी धुळीस मिळवली आहे, याचं वाईट वाटतं!
आपला, महाराष्ट्र राज्य विधिमंडळ
रस्त्यावरचं गँगवाॅर आता प्रतिभावान राजकीय परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पाय-या चढून लाॅबीपर्यंत येऊन पोहोचलंय. अशावेळेस जेव्हा विधिमंडळच सत्ताधारी असंविधानिक महायुती सरकारला पत्र लिहून आपल्या भावना मांडते… पत्रास कारण की… pic.twitter.com/C2NFVWF9Z0
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 1, 2024
READ ALSO :
हेही वाचा…नवनीत राणांच्या समोर अडचणींचा डोंगर, भाजपमध्ये करणार प्रवेश, तारीख अन वेळही ठरली
हेही वाचा…“सत्ताधारी पक्षातील अकरा साखरसम्राटांवर तब्बल १२०० कोटी रुपयांची खैरात, मात्र पंकजा मुंडेंवर पुन्हा अन्याय
हेही वाचा…मावळ लोकसभेवर वंचितचा दावा, स्वबळावर लढण्याचा दिला इशारा, आघाडीत बिघाडीची शक्यता
हेही वाचा…“..म्हणून शरद पवारांचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं, ” राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…“महायुती सरकारमध्ये हमरी तुमरी,” शिंदे गटाचे दोन्ही नेत्यांमध्ये धक्काबुक्की, विरोधकांची सडकून टिका