मुंबई : राज्यातील सत्ताधारी गटातील साखर सम्राटांना शिंदे-फडणवीस सरकारने पेटारा उघडून खैरात केल्याचे समोर आले आहे. या सरकारमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या साखर सम्राटांच्या ११ कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक तसेच एनसीडीकडून एकूण ११८१.८१ कोटींची थकहमीच्या रूपात खैरात केली आहे. एकीकडे साखर कारखानदारांची अडवणूक आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील कारखानदारांना मागच्या दाराने सुरू असलेली मदत भुवया उंचवणारी आहे.
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
सत्ताधारी पक्षातील अकरा साखरसम्राटांवर तब्बल १२०० कोटी रुपयांची खैरात झाली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला १४७.७९. रावसाहेब दानवे यांना १३८ कोटी, धनंजय महाडिक यांना १२६.३८ कल्याणराव काळे यांना १४६.३२ कोटी , अमरसिंग पंडीत यांना १५० कोटी, हर्षवर्धन पाटील यांना २२५ कोटी तर प्रशांत काटे यांना १३८ कोटी रूपयांची उधळण केल्याची टिका आता विरोधकांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसलं नाही. सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर मिंधे मेहरबान अशी टिका ठाकरे गटाने केली आहे.
आदर्श घोटाळ्यातून अडचणीत आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मालकीच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना, लक्ष्मीनगर, नांदेड कारखान्यासाठी १४७.७९ कोटींची थकहमी देण्यात आली आहे. यासोबतच धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिंकदर, सोलापूर कारखान्याला १२६.३८ कोटी रूपयांची थकहमी देण्यात आली आहे. तर हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना, महात्मा फुलेनगर, इंदापुर कारखान्यास १५० कोटी रूपयांची थकहमी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याच मालकीच्या निरा भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर, रेडा, इंदापुर कारखान्यास ७५ कोटी रूपयांची थकहमी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही मिळून २२५ कोटी रूपयांची थकहमी मिळाली आहे.
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लोकसभा नंतरच ? मंत्रिमंडळात काय निर्णय घेतला ?
मात्र दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा यामध्ये कोणताही समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे तोंड बघून थकहमीचा पेटारा खुला जात असल्याची टिका होत आहे. यावरून ठाकरे गटाने देखील राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारच्या काळात फक्त आणि फक्त पैशांची उधळण होताना दिसून येत आहे. तुम्ही भाजपमध्ये येऊन त्यांच्यासोबत संसार थाटला असेल, किंवा त्यांच्यासोबतच्या आघाडीमधल्या पक्षात असाल तर तुम्हाला ‘गिफ्ट’ मिळणं सहाजिक आहे. असंच सत्ताधारी पक्षातील अकरा साखरसम्राटांवर तब्बल १२०० कोटी रुपयांची खैरात झाली आहे. एकीकडे बळीराजा कर्जाच्या ओझ्याने दबला जातोय, पीकमालाला हमीभाव मिळत नसताना शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून, अशी उधळपट्टी म्हणजे मिंधेपणाचा कळस आहे.
महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारच्या काळात फक्त आणि फक्त पैशांची उधळण होताना दिसून येत आहे. तुम्ही भाजपमध्ये येऊन त्यांच्यासोबत संसार थाटला असेल, किंवा त्यांच्यासोबतच्या आघाडीमधल्या पक्षात असाल तर तुम्हाला ‘गिफ्ट’ मिळणं सहाजिक आहे. असंच सत्ताधारी पक्षातील अकरा साखरसम्राटांवर तब्बल… pic.twitter.com/lprTGtrrai
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 1, 2024
READ ALSO :
हेही वाचा…मावळ लोकसभेवर वंचितचा दावा, स्वबळावर लढण्याचा दिला इशारा, आघाडीत बिघाडीची शक्यता
हेही वाचा…“..म्हणून शरद पवारांचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं, ” राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…“महायुती सरकारमध्ये हमरी तुमरी,” शिंदे गटाचे दोन्ही नेत्यांमध्ये धक्काबुक्की, विरोधकांची सडकून टिका
हेही वाचा…शिंदे गटातील दोन आमदार विधीमंडळाच्या लॉबीतच भिडले, दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा