मुंबई : देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांची म्हणजेच इंडियाची बैठक मुंबईत होत असून अनेक नेते मुंबईत दाखल होत आहेत. यावरून भाजपचे मुंबईचे शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केलीय. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आशिष शेलार यांच्यावर पलटवार केलाय.
हेही वाचा…झुनका भाकर, पुरणपोळी, वडापाव अन् बरच काही., इंडियाच्या बैठकीसाठी खास मेन्यू, महाराष्ट्रीय पदार्थांचा समावेश
मुंबईत डरपोकांचा मेळावा “घमेंडीया” नावाने संपन्न होत आहे. ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला… ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या. अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करीत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे… फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना… महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे! अशी टिका शेलारांनी केलीय.
हेही वाचा…“सत्ता नहीं, पार्टी नहीं, तभी उद्धव ठाकरे का इतना डर”, दानवेंनी भाजपला डिवचलं
निडर बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला तुम्ही डरपोक कोणत्या तोंडाने म्हणता ही उपाधी आशिष शेलारांना लागू होते. भित्रट नसाल तर लावा निवडणुका. नसेलच शक्य तर किमान पुणे, चंद्रपूरची पोटनिवडणूक लावून दाखवा. असं आव्हान देखील त्यांनी दिलंय. एवढेच प्रेम तुम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एवढे प्रेम होते तर त्यांच्या निधनाच्या नंतर काही काळाने ‘मोदी लाटेवर’ स्वार होत २०१४ साली आमच्या पक्षाशी युती तोडण्याचे काम का केले? असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय.
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय पुन्हा लांबणीवर, कोर्टाकडून ‘ही’ नवीन तारिख जाहीर
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे प्रेरणास्थान आहेत आणि राहतील. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर कोणी बोट उचलते, त्याला चोख उत्तर आम्ही देतच असतो. त्याला तुमच्या पावतीची गरज नाही. इतकेच सावरकर प्रेम असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ देऊन गौरव करा. ही आमची जुनी मागणी पूर्ण करून दाखवा.. ‘अतिथी देवो भव’ ही आमची संस्कृती आहे. तुमची नसेल! आणि ज्यांचे स्वागत करतो आहोत, ते आपल्याच देशातील हाडा मासाची माणसे आहेत. मुद्दाम विमान वळवून पाकिस्तानात जाऊन केक खाणाऱ्यातले आम्ही नाही. ते तुम्ही आहात! जो महाराष्ट्र द्रोह तुम्हाला आज आठवतो आहे, तो गुजरातला उद्योग पळवले गेले तेव्हा नव्हता जागृत झाला. मराठी मुलांच्या नोकऱ्या हिरावल्या गेल्या तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राचा सन्मान आठवला नाही! ही दिशाभूल आमची नाही करता येणार तुम्हाला, सोडून बोला…
निडर बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला तुम्ही डरपोक कोणत्या तोंडाने म्हणता @ShelarAshish? ही उपाधी तुम्हाला लागू होते. भित्रट नसाल तर लावा निवडणुका. नसेलच शक्य तर किमान पुणे, चंद्रपूरची पोटनिवडणूक लावून दाखवा.
– एवढेच प्रेम तुम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एवढे… https://t.co/P2LF50ZPgC
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…इंडियाच्या नेत्यांना बसण्यासाठी ४५ हजारांची खूर्ची, ६५ खोल्या बुक, कोट्यावधीचा खर्च, सगळे पक्ष बेरोजगार होणार
हेही वाचा…“विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली”, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…शरद पवारांचा खंदा समर्थकानी घेतली मोठी भूमिका, निवडणुकीपुर्वी कोणत्या गटात जाणार ?
हेही वाचा…“विश्वगुरू अन् भाजप-आरएसएसच्या गुंडांनी प्रश्नांची उत्तरं द्या,” प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर संताप
हेही वाचा…“राज्यातील महसुल अधिकारीच सुरक्षित नाहीत? ऑफिसमधील छत कोसळलं,” वडेट्टीवारांचा सरकारवर संताप