मुंबई : आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार आरोप केले. त्यानंतर जरांगेंनी उपोषणाच्या ठिकाणाहून मुंबईकडे कुच केली. परंतु जालनासह अंबड व इतर ठिकाणी संचारबंदी लागू केल्यानंतर जरांगेंनी आपला ताफा माघारी फिरवला. यातच जरांगेंनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा विरूद्ध राज्य सरकार असा वाद उफाळून बाहेर आला आहे. यातच आता मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली होती आणि वाशीतून जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन माघारी का घेतलं ? याची देखील माहिती समोर आली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा…“राजकारणात मला कुणीही संधी दिली नाही ती अपघातानेच मिळाली”, अजित पवारांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला
अंतरवाली सराटीत सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी किती दबाव असणार ते आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आत्ताच्या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा झाली होती. त्याची माहिती देखील समोर आली पाहिजे. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा….जागा एक, इच्छूक तीन, शिरूर लोकसभेसाठी महायुतीत कुर्बानी देणार कोण ?
मुंबईच्या दिशेने निघालेल्या जरांगे पाटलांशी वाशीत मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली ती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगावी. पोलिसांवर किती दबाव आहे. ते आपण मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून दिसून येईल. या सरकारचा दबाव प्रत्येक व्यवस्थेवर आहे. खोटे अहवाल आणून निवडणुकीच्या काळामध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांमध्ये खरंच दम असेल तर जरांगे पाटलांशी काय बोलणं झालं होतं. ते त्यांनी जाहीर करावं. मग जरांगे पाटील बोलतील ना. की काय बोलणं झालं होतं. मग शरद पवार आणि ठाकरेंवर जे आरोप झाले आहेत. त्याच्याबाबत स्पष्टता येईल ना. असंही नाना पटोले यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…ना विलास लांडे, ना आढळराव पाटील..! अजित पवारांच्या ‘या’ एकेकाळच्या कट्टर समर्थकावर महायुती लावणार डाव ?
हेही वाचा….“करेक्ट कार्यक्रम तुमचा नाही तर तुमच्या पाठीमागे..”अजय महाराजांचे पुन्हा गौप्यस्फोट, जरांगेंवर हल्लाबोल
हेही वाचा…मनोज जरांगेंच्या बोलण्यातून राजकीय वास, मंत्र्यांचा गंभीर आरोप
हेही वाचा…जरांगेंच्या सहकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड, तीन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
हेही वाचा…“एकनाथ खडसे यांनी भाजपात यावं असं मी आवाहन केलंच नाही,” रक्षा खडसेंचं घुमजाव