पुणे : आगामी काही काळात लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. यातच राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच बघायला मिळत आहे.
हेही वाचा…“नांदेडमध्ये ‘कॉंग्रेसचा बुरूज’ ढासळला,” अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा उमेदवारी सांगितली आहे. ही जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा उमेदवारी देण्यात यावी, तसेच याठिकाणी मीच भक्कम इच्छूक उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यातच शिवाजीराव आढळराव पाटलांची अलिकडेच पुणे गृहनिर्माण व क्षेत्र प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरूर लोकसभेबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. तसेच ही जागा राष्ट्रवादीला दिली तरी माझी हरकत नसेल. असं आढळराव पाटलांनी म्हटलं होतं.
शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून दिलेल्या प्रतिक्रियेतून दावा सोडला असला तरी त्यांच्या मनात निवडणुक लढवण्याची तीव्र इच्छा त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. यातच दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून माजी आमदार विलास लांडे यांनी देखील निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातच जागा एक परंतु उमेदवार तीन, मग कुर्बानी कोण देणार ? असा प्रश्न केला असता मी कुर्बानी तर देणार आहे, परंतु कर्बानी घेणार पण आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“ते काय हळदीकुंकू आहे का, भांडण झालं म्हणून जायचं नाही ?”सुळेंवर टिका करणाऱ्या चाकणकरांची हवाच काढली
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने देखील आपल्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांचं नाव चर्चेत आलं आहे. यातच महायुतीत आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आहोत. त्यामुळे वरिष्ठ जे काही निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असणार अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते मंगलदास बांदल यांनी दिली आहे.
तसेच सध्या राज्यातील परिस्थिती पाहता अनेकजण भाजपमध्ये येत आहेत. ऐन निवडणुकीच्या वेळी खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये येतील अन् त्यांना उमेदवारी दिली जाईल. असा प्रश्न विचारला असता मंगलदास बांदल यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. अमोल कोल्हे भाजपमध्ये येणारच नाही. कारण भाजपने राज्यातील खासदाराचं केलेल्या सर्वेक्षणात अमोल कोल्हे यांची निष्क्रीय खासदार म्हणून ओळख आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांना भाजपात स्थान नसल्याचेही बांदल यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जरांगेंचे काळेधंदे बाहेर आले तर मराठा समाज दगडं मारतील”, अजय महाराज जरांगेंवर बरसले
हेही वाचा…जरांगे पाटलांनी मराठा समाजाला फसवलं, अजय महाराजांचा पुन्हा जोरदार घणाघात, पुराव्यासगट सगळचं दाखवलं
हेही वाचा…वंचितचा ३९ कमली अजेंडा आघाडीने स्विकारला, आता जागावाटप बाकी, किती जागा मिळणार ?
हेही वाचा…“तुतारी चिन्हांचं रायगडावर अनावरण,” भाजपला चांगल्याच मिरच्या झोंबल्या, म्हणाले…
हेही वाचा...तुतारी वाजवण्याचं मिटकरींचं चॅलेंज आव्हाडांकडून पुर्ण, एक लाखाचं चेक तयार पण…