नांदेड : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे आणखी पंधरा ते अठरा आमदार भाजपात दाखल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच नांदेडमध्ये कॉंग्रेसच्या ५५ माजी नगरसेवकांनी कॉंग्रेसची साथ सोडून भाजपात येण्याचा मार्ग निवडला आहे.
हेही वाचा…कमळाच्या बागेत अशोकाचं झाड; अखेर अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, सर्वात पहिली प्रतिक्रिया… म्हणाले…
भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. राज्यसभेवर अशोक चव्हाण बिनविरोध निवडून गेल्यानंतर काल त्यांचं नांदेड येथे जबरदस्त स्वागत करण्यात आलं. शहरात ठिकठिकाणी भाजपचे झेंडे लावण्यात आले. तर अशोक चव्हाण यांची यावेळी रॅली देखील काढण्यात आली. त्यानंतर आज अशोक चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवकांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा…“कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील”, चाकणकरांनी पुन्हा सुळेंना डिवचलं
याबाबत अशोक चव्हाण यांनीच माहिती दिली आहे. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय… pic.twitter.com/gaYXaL7dIu— Ashok Chavan (@AshokChavan1958) February 24, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“ते काय हळदीकुंकू आहे का, भांडण झालं म्हणून जायचं नाही ?”सुळेंवर टिका करणाऱ्या चाकणकरांची हवाच काढली
हेही वाचा…“तुतारी एका संघर्षाची सुरूवात करण्याची प्रेरणा”, शरद पवारांनी रायगडावरून शड्डू ठोकला
हेही वाचा…“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
हेही वाचा.“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
हेही वाचा…“आमदार आहेस, लय गल्लीतल्या गप्पा मारू नकोस, बाजारू विचारवंत,” पवार गटाने मिटकरींची बोलतीच केली बंद