मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे निवडणुक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. त्याआधी ठाकरे गटाला निवडणुक आयोगाकडून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. यातच आता जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीत ‘या’ जागांवर खरी रस्सीखेच, वाचा सविस्तर
महाराष्ट्रातील अकरा कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार आहे. हातात मशाल आहे आणि तुतारी आहे. असं राऊतांनी म्हटलं. त्यावर तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात आम्ही ४५ म्हणत होतो. परंतु नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सध्या वाढायला लागली आहे. विरोधी पक्षाने शेवटपर्यंत म्हणण्याची परंपरा आहे. असेही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…श्रीरंग बारणेंचा पाय आणखी खोलात, राष्ट्रवादीनंतर आता मावळवर भाजपनेही ठोकला दावा
दरम्यान, निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिल्यानंतर आज त्या चिन्हाचं रायगडावर अनावरण करण्यात आलं. तर तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गट आणि ठाकरे गटाने आता भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. यावरून आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आमदार आहेस, लय गल्लीतल्या गप्पा मारू नकोस, बाजारू विचारवंत,” पवार गटाने मिटकरींची बोलतीच केली बंद
हेही वाचा…“कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील”, चाकणकरांनी पुन्हा सुळेंना डिवचलं
हेही वाचा…“मोदींविरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा अन् मगच…”राज्याच्या मंत्र्याने इंडिया आघाडीला दिलं आव्हान
हेही वाचाजरांगेंवर गंभीर आरोप, मराठा समाज आक्रमक, अजय बारस्कर महाराजांवर हल्ला
हेही वाचा..राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, भाजपने नार्वेकरांसाठी निश्चित केला ‘हा’ मतदारसंघ