नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. परंतु इंडिया आघाडीत अजूनही चलबिचल सुरू झाली आहे. इंडिया आघाडीच्या अनेक बैठका पार पडल्या. परंतु या बैठकांसाठी देशातील सर्वच विरोधक एका बैठकीत आले नसल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचा अजूनही पंतप्रधान पदाचा चेहरा अजूनही ठरलेला नाहीय. यावरून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना मोठं आवाहन दिलंय.
हेही वाचा…मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं ठरलंय, ‘हा’ उमेदवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची लवकरच बैठक पार पडणार आहे. त्याआधी उदय सामंत यांनी विरोधकांना आव्हान देत जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. विरोधकांनी प्रथम मोदींविरूद्ध पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे धाडस दाखवावे आणि मग इंडिया आघाडी करावी, असे थेट आव्हानच त्यांनी इंडिया आघाडीला दिलं.
हेही वाचा…बीड लोकसभा निवडणुक लढवणार का ? पंकजा मुंडेंनी घेतलेल्या भूमिकेत बदल, म्हणाल्या…
दरम्यान, इंडिया आघाडीच्या तीन बैठका झाल्यात. त्यातील पहिल्या बैठकीला होते ते दुसऱ्या बैठकीला नव्हते. तर तिसऱ्या बैठकीला दुसऱ्या बैठकीत होते. ते उपस्थित नव्हते अन् पंतप्रधान पदाचे दावेदारही होते. ( नितीश कुमार ) तेच आता बाजूला गेले आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत त्यांनी आपला मोदींविरूदचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे धाडस दाखवावे, मग इंडिया बिंडिया करावे असेही सामंतांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचाजरांगेंवर गंभीर आरोप, मराठा समाज आक्रमक, अजय बारस्कर महाराजांवर हल्ला
हेही वाचा..राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, भाजपने नार्वेकरांसाठी निश्चित केला ‘हा’ मतदारसंघ
हेही वाचालोकसभेसाठी महाविकास आघाडीत ‘या’ जागांवर खरी रस्सीखेच, वाचा सविस्तर
हेही वाचा…श्रीरंग बारणेंचा पाय आणखी खोलात, राष्ट्रवादीनंतर आता मावळवर भाजपनेही ठोकला दावा
हेही वाचा..महायुतीत गर्दी वाढली, उमेदवारांची आशा माळवली, विदर्भाचा भाजपचा बडा नेता कॉंग्रेसच्या वाटेवर ?