नागपुर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना, राष्ट्रवादी सह कॉंग्रेसचे नेते देखील आता भाजपमध्ये दाखल होत आहेत. यातच कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील कॉंग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते देखील भाजपमध्ये दाखल होतील. असा दावा भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केलाय. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील त्यावर प्रत्युत्तर देत आशिष देशमुख पुन्हा कॉंग्रेसकडे येणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराच्या निकटवर्तीयावर ईडीची कारवाई
राज्यात सध्या विरोधी पक्षनेता हा सत्ताधारी पक्षात येण्याची परंपरा आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार देखील भाजपात लवकरात लवकर दाखल होतील. असा दावा आशिष देशमुख यांनी केला होता. त्यावर आता आशिष देशमुख हेच मागच्या दारातून आम्हाला भेटून जात आहे अन् कॉंग्रेसकडे उमेदवारी मागत आहेत. हा हवश्या, गवश्या नवश्या आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…शिरूरचा दावा आढळराव पाटलांनी सोडला, कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट कुणाला उमेदवारी देणार ?
महायुतीमध्ये सध्या अनेक नेत्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे भाजपच्या अनेकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. आशिष देशमुखही त्यापैकीच एक असून ते आता पुन्हा कॉंग्रेसकडे उमेदवारी मागत आहे. उपऱ्यांना उपरेगिरी सुचते. आशिष देशमुख स्व: मागील दारातून आम्हाला भेटत आहेत. असेही ते म्हणाले. गेल्या वर्षी जुन महिन्यात आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टिका केली होती. यातच आशिष देशमुख सावनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं ठरलंय, ‘हा’ उमेदवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचाबीड लोकसभा निवडणुक लढवणार का ? पंकजा मुंडेंनी घेतलेल्या भूमिकेत बदल, म्हणाल्या…
हेही वाचा…उद्या रायगडावर शरद पवार गटाची ‘तुतारी’ धुमणार, भव्य लॉंन्चिंग सोहळा, लोकसभेचं रणशिंग फुंकणार
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक लढवून दिल्लीत जाणार का ?” फडणवीसांनी ‘त्या’ चर्चेला दिलं पुर्णविराम, म्हणाले…
हेही वाचा..“तुमचा संपूर्ण भाजप जळून खाक होईल, एवढी ताकद माझ्या महाराष्ट्रात “