बुलढाणा : जनतेला घर दिलं, छप्पर दिलं म्हणता पण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं छप्पर उडालं आहे. काय चाटायचंय तुमचं प्रधानमंत्री आवास योजनतेलं घरं ? तुमचा संपुर्ण भाजप जळून खाक होईल ऐवढी ताकद माझ्या महाराष्ट्रात आहे. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार घणाघात चढवला. काल ठाकरेंनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्यातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. चिखली, मोताळा, आणि जळगाव जामोद येथे ठाकरेंची सभा पार पडली.
हेही वाचा..“ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला”, भाजपच्या आणखी एका आमदाराचं निधन
अमित शहा अलीकडेच म्हणाले की घराणेशाही संपवणार. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुलाला व शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. हो करायचे आहे. पण जनतेने मते दिली तर होईन ना मुख्यमंत्री .मुख्यमंत्री पद म्हणजे बीसीसीआयचे पद नाही. तुमचे असे क्रिकेटमधले काय योगदान आहे. जय शहाचे काय कर्तृत्व आहे. ? असा सवाल करत मुंबईची फायनल मॅच अहमदाबादला नेणे हे त्याचे कर्तृत्व. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…“वाजवा तुतारी, गाडा गद्दारी”, शरद पवार गटाला अखेर मिळालं ‘तुतारी’ चिन्ह, आयोगाचा मोठा निर्णय
याआधी भाषणाला सुरूवात करतांना त्यांनी अजित पवारांच्या सभेत बिर्याणी खाण्यासाठी झालेल्या गर्दीवरून टोला लगावला. ते म्हणाले की, या देशात आता जिवाला जीव देणारी नव्हेत तर जीव घेणारी माणसे दिसत आहेत. सभांना गर्दी जमवण्यासाठी बिर्याणीची लालूच दाखवली लागते. लोक बिर्याणीवर ताव मारून निघून जातात. शिवसेनेच्या सभेला लोक स्व:तहून येतात. आम्हाला बिर्याणी वाटण्याची गरज पडत नाही. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा.मोठी बातमी…! ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराच्या निकटवर्तीयावर ईडीची कारवाई
हेही वाचा…शिरूरचा दावा आढळराव पाटलांनी सोडला, कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट कुणाला उमेदवारी देणार ?
हेही वाचा…“अजिदादांनीच पवार कुटुंबाला एकटं पाडलं,” शरद पवारांचा पणतुचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा शिंदे गटात दाखल होणार, तारिख ठरली
हेही वाचाबाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांचं निधन, उद्धव ठाकरेंनी नियोजित दौरा केला रद्द