पुणे : कुटुंबात अशा कोणालाही संधी मिळाल्या नाहीत, त्या शरद पवारांनी अजितदादांना दिल्यात. खरंतर अजितदादांना कुटुंबांनी एकटं पाडलं नाही तर अजिदादांनीच पवार कुटुंबाला एकटं पाडलं आहे. असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी अजितदादांवर जोरदार टिका केली. अलिकडेच माझा परिवार सोडून मला पवार कुटुंबातील सर्वच जण एकटं पाडणार असं विधान अजितदादांनी केलं होतं. त्यावर रोहित पवारांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा….“हाताचा मटनाचा वास गेला असेलच…”उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहित शिल्पा बोडसेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
अजितदादांवर शरद पवार साहेबांनी मुलांसारखं प्रेम केलं आहे. पक्षात ज्या ज्या संध्या आल्या त्या कुटुंबातील इतरांना न मिळता. त्या दादांना मिळाल्यात. त्यांच्यावर अन्याय झाला, असं कुणालाही वाटत नाही. कुटुंबाला त्यांनी एकटं पाडलं असं कुठेही वाटत नसून त्यांनीच कुटुंबाला एकटं पाडलं असं म्हणालया हरकत नाही. अजितदादांकडून अजूनही कोणताही उमेदवार दिला गेला नाही. त्यामुळे चुरस असून कुठेच नाही. चुरही ही दोन पक्षात होणार नसून सामान्य जनशक्ती आणि बलाढ्य शक्ती विरोधात चुरस होईल. तसेच पैशाचा आणि ताकदीचा अंहकार कधीही खाली येईल. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“जरांगेंना शरद पवारांचा फोन, आंदोलनासाठी पैसे,” वानखेडेंच्या आरोपावर रोहित पवारांचं तीन ओळीत उत्तर, म्हणाले…
शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला. त्यांच्याच हातून पक्ष काढून दुसऱ्याला पक्ष देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत साहेब लढायचं कधीच थांबत नाहीत. नवीन नाव तसेच नवीन चिन्हांबाबत देखील अजित पवार गटाने विरोध केला होता. हा विषय कोर्टात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील सामान्य लोकांच्या बाजूने निकाल दिला. आता तुतारी चिन्ह आम्हाला मिळालं आहे. त्यामुळे मशाल हातात घ्यायची आहे अन् तुतारी वाजवायची आहे आणि महाराष्ट्रात स्वराज्य येण्यासाठी सगळ्यांना एकत्र येऊन प्रयत्न करायचे आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा शिंदे गटात दाखल होणार, तारिख ठरली
हेही वाचाबाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांचं निधन, उद्धव ठाकरेंनी नियोजित दौरा केला रद्द
हेही वाचा..“ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला”, भाजपच्या आणखी एका आमदाराचं निधन
हेही वाचा…“वाजवा तुतारी, गाडा गद्दारी”, शरद पवार गटाला अखेर मिळालं ‘तुतारी’ चिन्ह, आयोगाचा मोठा निर्णय
हेही वाचा..महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ हरपला..! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दु:खद निधन