मुंबई : शिवसेना पक्षात शिवसेना पक्षप्रुख उद्धव ठाकरे यांचा व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला किमंत आहे, पण आता कळले की येथे विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांना पक्षाचे पुर्ण अधिकार दिले असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला देखील या जुमानत नाही. मी पक्षाचटे अहोरात्र प्रामाणिक पणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत, रंजना नेवाळकर शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत राहिल्या असा आरोप करत पुर्व विदर्भ महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख व प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा…अखेर इंडिया आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, मोदी विरोधात विरोधकांची जोरदार रणनिती
माझी चार वर्षांनी मेहनत आज व्यर्थ गेली आहे. याचे दु:ख आहे. पक्षात शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला काही किमंत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत असल्याचं शिल्पा बोडखे यांनी म्हटले आहे. तसेच मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल दोघींचे अभिनंदन. पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा…असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा…जरांगे पाटलांना तो फोन नेमका कुणाचा आला ? आंदोलनाला पैसे कोण पुरवायचा ? आता पर्यंतचा सर्वात मोठा गौफ्यस्फोट
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मला सोशल मीडिया या पदावर काम करायचे नाही म्हणून मी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्र देखील पाठवले, परंतु विशाखा राऊत यांना मी काम करू नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असे वाटत आहे. जर यांना संघटन वाढविण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत आहे तर मी आपल्या पुर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्त्या पदाचा राजीनामा देत आहे. यातच माझा पक्षात टिशू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद. असंही म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, पुढे कोणाचे असे राजकीय आयुष्य बर्बाद करू नका. नाही तर कोणताही मराठी माणुस मराठी माणसाच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभा राहणार नाही. कारण शिवसेना पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा येथे चांगल्या चाहाड्या करणाऱ्या व षडयंत्र रचणाऱ्यांना जास्त महत्व आहे. असेही त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र…
माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते @AUThackeray जी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत… pic.twitter.com/OZJUyFbKwa
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) February 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“जरांगेंना शरद पवारांचा फोन, आंदोलनासाठी पैसे,” वानखेडेंच्या आरोपावर रोहित पवारांचं तीन ओळीत उत्तर, म्हणाले…
हेही वाचा..“आजी माजी, नाराज, जुने पुराने सर्व एकत्र या, आपण क्रांती घडवू,” करूणा मुंडेंचं सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन
हेही वाचा…“..तर मी राजकारणातून संन्यास घेऊन, ” राधाकृष्ण विखे पाटलांनी राऊतांना दिलं खुल चॅलेंज
हेही वाचा..“याच दिवशी शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले,” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
हेही वाचा…“पक्षात चहाड्या व षडयंत्र रचणाऱ्यांना महत्व, राजकीय आयुष्य बर्बाद करू नका,” ठाकरे गटातील महिला नेत्याचा राजीनामा