पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्याच दिवशी आपल्या संसदीय कारकिर्दीची सुरूवात केली होती. २२ फेब्रवारी १९६७ रोजी शरद पवार यांनी पहिल्यांदाच आमदार म्हणून शपथ घेतली होती. त्याला आज ५७ वर्ष पुर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत भाष्य केले आहे.
हेही वाचा…“जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढलीय, तो आता थांबणार नाही”, भुजबळांचा जरांगेंवर जोरदार हल्लाबोल
कसलीयी पार्श्वभूमी नसताना एक तरूण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते. बघता बघता लोकांचं ती निवडणुक हातात घेतात आणि तो तरूण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरूण म्हणजे आदरणीय शरचंद्र पवार साहेब. त्यांनी पहिली निवडणूक जिंकली. त्याला आज ५७ वर्ष पुर्ण झालीत. आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांना दिलेली साथ आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम खूप मोलाचे आहे. हे प्रेम कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपले प्रेम, विश्वास आणि साथ याबद्दल आपण सर्वांचे कृतज्ञतापुर्वक आभार अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा….“जरांगे पाटलांमुळे महिलांवर शाब्दिक ब’ला’त्का’र होताहेत,” बारसकरांनंतर जरांगेंच्या आणखी एका महिला सहकाऱ्याचे आरोप
पुरोगामी विचारांचा वारसा जपत गेली ५७ वर्ष अखंड लोकसेवेस वाहून घेणारे महाराष्ट्राचे सह्याद्री म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब होय. आदरणीय पवार साहेबांनी २२ फेब्रुवारी १९६७ रोजी म्हणजे आजच्याच दिवशी पहिल्यांदा आमदार होत आपल्या संसदीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ५७ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा झंझावाती प्रवास आजही अथक सुरु आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी प्रत्येकालाच आदरणीय पवार साहेब जवळचे वाटतात. आदरणीय खा. शरद पवार साहेबांचा हा अथक, अखंड, अविरत प्रवास असाच सुरू राहो. आदरणीय खा. शरद पवार साहेबांना संसदीय कारकिर्दीच्या ५७ व्या वर्षपूर्तीनिमित्त शुभेच्छा! असे राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पक्षात चहाड्या व षडयंत्र रचणाऱ्यांना महत्व, राजकीय आयुष्य बर्बाद करू नका,” ठाकरे गटातील महिला नेत्याचा राजीनामा
हेही वाचा…अखेर इंडिया आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, मोदी विरोधात विरोधकांची जोरदार रणनिती
हेही वाचा.जरांगे पाटलांना तो फोन नेमका कुणाचा आला ? आंदोलनाला पैसे कोण पुरवायचा ? आता पर्यंतचा सर्वात मोठा गौफ्यस्फोट
हेही वाचा…जागा वाटपाच्या मुद्यावरून शिंदे गटाचा खासदार वैतागला, म्हणाला, “आम्हाला काहीच सांगितलं जात नाहीय…”
हेही वाचा“७०० जणांना विषबाधा, रूग्णांवर रस्त्यावरच उपचार,” राज्याचे विरोधी पक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले…