पुणे : मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या संगिता वानखेडे यांनी देखील पुण्यात काल जोरदार हल्लाबोल केला. तसेच जरांगे पाटील उपोषणाला बसले असता तसेच मुंबईच्या दिशेने निघाले असता त्यावेळी नेमकी कुणाचा फोन आला होता. त्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतले. याबाबत देखील संगिता वानखेडे यांनी भाष्य केले आहे. याच फोनचा काल अजय महाराज बारसकर यांनी उल्लेख केला होता. त्यामुळे याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे. तर संगिता वानखेडे यांनी त्या व्यक्तींचं नाव समोर आणलं आहे.
हेही वाचा…“महानंद आता गुजरातला विकलेय”, आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
अंतरवाली सराटीत कोणत्याही बैठकीत मनोज जरांगे पाटील कोणाचाही ऐकत नव्हते. त्याठिकाणी फक्त त्यांना एक फोन यायचा आणि त्याच व्यक्तीचं जरांगे पाटील ऐकत होता. ती व्यक्ती म्हणजे शरद पवार. शरद पवारांचाच जरांगे पाटील ऐकत आहे. अन्य कुठल्याही व्यक्तीचा ऐकत नाही. तसेच सर्व आंदोलनाचा खर्च हा शरद पवारांनी उभारलेला आहे. हे सर्व काही काळानंतर बाहेर येईल. असा दावा देखील संगिता वानखेडे यांनी केलाय.
शरद पवार अंतरवाली सराटीत आल्यानंतर जरांगे पाटलांचे हावभाव पाहूनच मला त्याठिकाणी समजून आलं होतं. परंतु इतक्या वर्षाने मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे. त्यामुळे मी त्याठिकाणी गप्प बसलो, त्यामुळे आता नाही फुटायचे असे मी ठरवले. असेही त्या म्हणाल्या. जरांगे पाटील काल बोलला की असे १० ते १२ अजय बारस्कर बाहेर येतील. कारण जरांगे पाटलांना माहिती होतं की, आपलं सगळं बाहेर येईल. त्यांचे काही सहकारी फुटलेले आहेत. त्यांचे मतं लोकांना पटलेली नाहीत. असे अनेक १०० टक्के लोक बाहेर येणार आहेत.
हेही वाचा…मुंबईतील चार लोकसभेसाठी ठाकरेंचे ‘हे’ शिल्लेदार ठरले, भाजप अन् शिंदे गटाला देणार मात ?
गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेत आहे. छगन भुजबळांना याआधी देखील मोठा विरोध केला आहे. जरांगेंच्या पाटलांच्या बाजूने अनेकदा भूमिका मांडली आहे. परंतु त्यानंतर भुजबळांच्या कार्यकर्त्यांकडून मला सोशल मीडिया, तसेच व्हिडीओ कॉल, करून मला ट्रोल, तसेच अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली. याचा फक्त उल्लेख करण्यासाठी जरांगे पाटलांकडे विनंती केली होती. पंरतु त्यांनी मला वाकड्या भाषेत उत्तर दिलं. त्यानंतर फेसबुक लाईव्ह दरम्यान, विषाची बाटली घेऊन मी बसली की मला ट्रोल करू नका. तरीदेखील माझ्यासह मुलींना देखील ट्रोल करण्यात आले.
सरतेशेवटी उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला साताऱ्याला बोलवलं. तरी देखील जरांगे याबाबत काही बोलला नाही. त्यांनी फक्त समाजाची फसवणूक केली आहे. अंतरवाली सराटीत दंगल पेटल्यानंतर जरांगे पाटील समोर आला. नाही तर जरांगे कोण आहे ? हे कुणालाच माहिती नव्हतं. त्यामुळे अंतरवाली सराटीत जी दंगल झाली. ती नेमकी जरांगे पाटलांनीच घडवली का ? याबाबत आता शंका यायला लागली आहे. असा दावा देखील त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जागा वाटपाच्या मुद्यावरून शिंदे गटाचा खासदार वैतागला, म्हणाला, “आम्हाला काहीच सांगितलं जात नाहीय…”
हेही वाचा“७०० जणांना विषबाधा, रूग्णांवर रस्त्यावरच उपचार,” राज्याचे विरोधी पक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले…
हेही वाचा…“जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढलीय, तो आता थांबणार नाही”, भुजबळांचा जरांगेंवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा….“जरांगे पाटलांमुळे महिलांवर शाब्दिक ब’ला’त्का’र होताहेत,” बारसकरांनंतर जरांगेंच्या आणखी एका महिला सहकाऱ्याचे आरोप
हेही वाचा.“आता भाजपच्या D फॉर दलालीवर आवाज उठवण्याची हिंमत दाखवतील का?”, रोहित पवारांचा अजित पवार गटाला सवाल