मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता वेगळंच वळण लागतांना दिसत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले आहेत. यातच २४ तारखेपासून संपुर्ण राज्यभरात आंदोलन करणार तसेच रास्तो रोको करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. त्यावर आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय.
हेही वाचा….सुप्रिम कोर्टाचा भाजप सरकारला दणका..! चंदीगड महापौर निवडणूक गैरव्यवहार प्रकरण
संपुर्ण राज्यातील सगळ्या नागरिकांना माहिती आहे की, सर्व काही गोष्टी नियमाने हळूहळू होत आहेत. त्याकडे लक्ष द्या. जरांगे पाटलांना प्रसिद्धीची नशा चढली आहे. तो कधीही थांबणार नाही. त्यामुळे त्यांना सारखी प्रसिद्धी हवी असती. आम्ही देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत सांगितलं आहे की, हे मारूतीचं शेपुट आहे. हे संपणारं नाही. एक झालं की एक असं सुरूच आहे. कायदा तसेच नियम सुद्ध काही कळत नाही. लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. सहाजिकच लोक मिटींग घेणार, चर्चा करणार, त्यांना बंदी करणार. तसेच म्हातारे लोकांना उपोषणाला बसण्यासाठी सांगत आहे. हा काय मुर्खपणा आहे. असा हल्लाबोल देखील छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर केला आहे.
हेही वाचा…अजय बोरसकर हा भोंदू महाराज, सरकारचा ट्रॅप, जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, प्रसिद्ध किर्तनकार अजय महाराज यांनी देखील काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंनी मराठा समाजाला फसवलं आहे. त्यांनी काही अधिकाऱ्यांसोबत पाच गुप्त बैठका घेतल्या होत्या. मुंबईत अचानक निघालेल्या आंदोलनात वाशीतून माघारी का घेतली. तसेच बंद खोलीत काय चर्चा झाली. असे अनेक सवाल बारसकर यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे जरांगेंबाबत आता मराठा समाजाकडून शंका उपस्थित केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा….“जरांगे पाटलांमुळे महिलांवर शाब्दिक ब’ला’त्का’र होताहेत,” बारसकरांनंतर जरांगेंच्या आणखी एका महिला सहकाऱ्याचे आरोप
हेही वाचा.“आता भाजपच्या D फॉर दलालीवर आवाज उठवण्याची हिंमत दाखवतील का?”, रोहित पवारांचा अजित पवार गटाला सवाल
हेही वाचा…“महानंद आता गुजरातला विकलेय”, आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
हेही वाचा…मुंबईतील चार लोकसभेसाठी ठाकरेंचे ‘हे’ शिल्लेदार ठरले, भाजप अन् शिंदे गटाला देणार मात ?
हेही वाचा…जरांगेंच्या मुलांमध्येही अंहकार, पाच गुप्त बैठका, अजय महाराजांचे जरांगेंवर काय काय आरोप ?