नंदुरबार : मंगळवारी असलेल्या माधी वारीनिमित्त भगरीचा भात आणि आमटी खाल्ल्याने राज्यात नंदुरबार, हिंगोली आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यांत मिळून ७०० जणांना विषबाधा झाली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त ४०० जण बुलढाणा जिल्ह्यातून असून नंदुरबार आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी १५० जणांना विषबाधा झाली. बुलढाणा जिल्ह्यातील खापरखेड व सोमठाणा येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. तेथेच डॉक्टरच उपलब्ध नसल्याने खासगी डॉक्टरांना बोलवण्यात आले. रूग्णांची वाढती संख्या पाहता रूग्णालयाच्या आवारातच ताडपत्री टाकून सलाईन देत उपचार करण्यात आला. याचे फोटो समाज माध्यमांवर फिरत राहिले. त्यावरून आता राज्यातील आरोग्य व्यवस्था कशी आहे. हेदिसून आले आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…जरांगेंच्या मुलांमध्येही अंहकार, पाच गुप्त बैठका, अजय महाराजांचे जरांगेंवर काय काय आरोप ?
जनतेला मरू द्या, आपले मंत्री आमदार खुश राहिले पाहिजे हीच आहे मोदींची खरी गॅरंटी. असं म्हणत वडेट्टीवार यांनी यासंदर्भात दोन फोटो ट्विट केले आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर तब्बल ३० कोटींचा खर्च, याबाबत एक बातमी तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर रूग्णांवर उपचार करतांनाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एकीकडे महायुतीतील मंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी खैरात आणि उधळपट्टी सुरू आहे. असा हल्लाबोल करण्यात आला आहे.
हेही वाचा….सुप्रिम कोर्टाचा भाजप सरकारला दणका..! चंदीगड महापौर निवडणूक गैरव्यवहार प्रकरण
तर दुसरीकडे आरोग्य सुविधांच्या अभावी महाराष्ट्रातील सामान्य माणूस रस्त्यावर दम तोडतोय. विषबाधा झालेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी डॉक्टर नाही, यंत्रणा नाही. आणि महायुतीचे मंत्री आलिशान बंगल्यामध्ये झोपा काढताय. विकसित भारत संकल्प फक्त टीव्हीवर जाहिरातींमध्ये. प्रत्यक्षात संताप आणि चीड आणणारे वास्तव आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
जनतेला मरू द्या, आपले मंत्री आमदार खुश राहले पाहिजे हीच आहे मोदींची खरी गॅरंटी!
एकीकडे महायुतीतील मंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी खैरात आणि उधळपट्टी सुरू आहे. दुसरीकडे आरोग्य सुविधांच्या अभावी महाराष्ट्रातील सामान्य माणूस रस्त्यावर दम तोडतोय.
विषबाधा झालेल्या रुग्णांना उपचार… pic.twitter.com/MIBsIxtEas
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढलीय, तो आता थांबणार नाही”, भुजबळांचा जरांगेंवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा….“जरांगे पाटलांमुळे महिलांवर शाब्दिक ब’ला’त्का’र होताहेत,” बारसकरांनंतर जरांगेंच्या आणखी एका महिला सहकाऱ्याचे आरोप
हेही वाचा.“आता भाजपच्या D फॉर दलालीवर आवाज उठवण्याची हिंमत दाखवतील का?”, रोहित पवारांचा अजित पवार गटाला सवाल
हेही वाचा…“महानंद आता गुजरातला विकलेय”, आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
हेही वाचा…मुंबईतील चार लोकसभेसाठी ठाकरेंचे ‘हे’ शिल्लेदार ठरले, भाजप अन् शिंदे गटाला देणार मात ?