नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशातील विरोधकांनी एकजुट असलेल्या इंडिया आघाडीत आता वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीसांठी उत्तर प्रदेशात कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीत अखेर जागावाटपांवर शिक्कामोर्तेब करण्यात आला आहे. कॉंग्रेसने अपेक्षापेक्षा जास्त जागांची मागणी केल्यामुळे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जागावाटपाची चर्चा बासनात गुंडाळून ठेवली होती. मात्र कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तेब झाल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
हेही वाचा….“आता भाजपच्या D फॉर दलालीवर आवाज उठवण्याची हिंमत दाखवतील का?”, रोहित पवारांचा अजित पवार गटाला सवाल
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा असून नव्या फॉर्म्युल्यानुसार समाजवादी पार्टीने कॉंग्रेसला १७ जागा सोडल्या असून एक जागा चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाला देण्याचा निर्णय घेतला आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशात एकूण ६२ जागा लढवणार आहे. यातच मुरादाबाद, मतदारसंघाचा आग्रह कॉंग्रेसने तर वाराणसीचा आग्रह सापने सोडून दिलाय.
हेही वाचा…“महानंद आता गुजरातला विकलेय”, आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
रायबरेली, अमेठी, वाराणसी, कानपुर, झांसी आदी जागा कॉंग्रेस लढवणार आहेत. दुसऱ्या बाजूला इतर राज्यांमध्ये देखील कॉंग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. यातच महाराष्ट्रात एकूण ४८ पैकी कॉंग्रेसने २२ जागांवर दावा सांगितला आहे. परंतु याठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी करण्याचा याठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे. त्यामुळे आता एक महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असतांना जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला कधी ठरणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा.जरांगे पाटलांना तो फोन नेमका कुणाचा आला ? आंदोलनाला पैसे कोण पुरवायचा ? आता पर्यंतचा सर्वात मोठा गौफ्यस्फोट
हेही वाचा…जागा वाटपाच्या मुद्यावरून शिंदे गटाचा खासदार वैतागला, म्हणाला, “आम्हाला काहीच सांगितलं जात नाहीय…”
हेही वाचा“७०० जणांना विषबाधा, रूग्णांवर रस्त्यावरच उपचार,” राज्याचे विरोधी पक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले…
हेही वाचा…“जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढलीय, तो आता थांबणार नाही”, भुजबळांचा जरांगेंवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा….“जरांगे पाटलांमुळे महिलांवर शाब्दिक ब’ला’त्का’र होताहेत,” बारसकरांनंतर जरांगेंच्या आणखी एका महिला सहकाऱ्याचे आरोप