नांदेड : राज्यात सध्या राजकीय परिस्थिती पाहता मोठ मोठे घोटाळा करणारे लोकं एका व्यासपीठावर आले आहेत. राज्यातील जनता सध्या विरोधात असून यासाठी स्वराज्य शक्ती सेना हा पक्ष काढलेला आहे. या पक्षाच्या माध्यमातून नवीन लोकांना संधी द्यायची आहे. आगामी लोकसभा, विधानसभा तसेच जिल्हा परिषद, नगरपरिषदा तसेच नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये नवीन लोकांना संधी दिली जाणार आहे. असे आवाहन स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या करूणा शर्मा यांनी केलं आहे.
हेही वाचा…जागा वाटपाच्या मुद्यावरून शिंदे गटाचा खासदार वैतागला, म्हणाला, “आम्हाला काहीच सांगितलं जात नाहीय…”
त्या पुढे म्हणाल्या की, आज भाजपमध्ये अनेक जुने लोकं निष्ठेने काम करत आहेत. परंतु त्यांना कुठेही संधी देण्यात आलेली नाही. सध्या महायुतीत खिचडी झाली असून फक्त एका नेत्याला विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे आमच्या पक्षात सगळ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही भाजपसोडून देखील याठिकाणी येऊ शकतात. एक महिला म्हणून आम्ही पक्ष स्थापन केला आहे. महाराष्ट्रमध्ये आपल्याला क्रांती घडवायची आहे.
हेही वाचा…“७०० जणांना विषबाधा, रूग्णांवर रस्त्यावरच उपचार,” राज्याचे विरोधी पक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले…
राजकारण हे फक्त व्यक्तिमत्वाचं काम आहे. आपल्या देशाची राजधानी मुंबईतून अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून नाही तर मुख्यमंत्री म्हणून विचार करत आहेत. त्यामुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जे नवीन आणि जुने लोकं आहेत. तसेच तुमचा पक्षात फक्त वापर होतो. असे सगळे एकत्र या. आपण लढू आणि महाराष्ट्र एक नवीन क्रांती घडवू. असे आवाहन देखील करूणा मुंडे यांनी केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर मी राजकारणातून संन्यास घेऊन, ” राधाकृष्ण विखे पाटलांनी राऊतांना दिलं खुल चॅलेंज
हेही वाचा..“याच दिवशी शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले,” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
हेही वाचा…“पक्षात चहाड्या व षडयंत्र रचणाऱ्यांना महत्व, राजकीय आयुष्य बर्बाद करू नका,” ठाकरे गटातील महिला नेत्याचा राजीनामा
हेही वाचा…अखेर इंडिया आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, मोदी विरोधात विरोधकांची जोरदार रणनिती
हेही वाचा.जरांगे पाटलांना तो फोन नेमका कुणाचा आला ? आंदोलनाला पैसे कोण पुरवायचा ? आता पर्यंतचा सर्वात मोठा गौफ्यस्फोट