मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातला पळवल्याचा आरोप करण्यात आला. यातच आता दुध क्षेत्रात देशातील आघाडीची असलेली महानंद डेअरी देखील गुजरातला विकली जात असल्याचे सध्या चित्र निर्माण झालंय. याचं कारण म्हणजे महानंदचे चेअरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाने एकत्रितपणे राजीनामा दिला आहे. त्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरून संजय राऊतांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार टिका केलीय आहे. त्यावर विखे पाटलांकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.
हेही वाचा…“७०० जणांना विषबाधा, रूग्णांवर रस्त्यावरच उपचार,” राज्याचे विरोधी पक्षनेते सरकारवर संतापले, म्हणाले…
महाराष्ट्रातील प्रमुख महानंदा डेअरी उद्योग हा गुजरातकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहणे हे महानंद डेअरीचे चेअरमन आहेत. विखे पाटलांच्या मेहुण्यानेच महानंदासारखी डेअरी गुजरातकडे वळवली आहे. असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केला आहे. त्यावर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढलीय, तो आता थांबणार नाही”, भुजबळांचा जरांगेंवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना मनोपचाराची गरज आहे. त्यांनी माझ्याविरोधात आरोप केले आहेत. आता मी त्यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी कुणाचे घरे फोडले, ते आता मला सांगावं लागणार आहे. राऊतांनी आरोप सिद्ध केलेत. तर मी राजकारणातून सन्यांस घेईन. असं जाहीर आवाहन विखे पाटलांनी राऊतांना दिलंय.
READ ALSO :
हेही वाचा..“याच दिवशी शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले,” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
हेही वाचा…“पक्षात चहाड्या व षडयंत्र रचणाऱ्यांना महत्व, राजकीय आयुष्य बर्बाद करू नका,” ठाकरे गटातील महिला नेत्याचा राजीनामा
हेही वाचा…अखेर इंडिया आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, मोदी विरोधात विरोधकांची जोरदार रणनिती
हेही वाचा.जरांगे पाटलांना तो फोन नेमका कुणाचा आला ? आंदोलनाला पैसे कोण पुरवायचा ? आता पर्यंतचा सर्वात मोठा गौफ्यस्फोट
हेही वाचा…जागा वाटपाच्या मुद्यावरून शिंदे गटाचा खासदार वैतागला, म्हणाला, “आम्हाला काहीच सांगितलं जात नाहीय…”