पुणे : मनोज जरांगे पाटील यांना शरद पवार यांचा फोन यायचा. तसेच संपुर्ण आंदोलनासाठी शरद पवाराचं जरागेंना पैसे पुरवत होते. तसेच मराठा समाजाचे खरे मारेकरी हे शरद पवारच असल्याचा घणाघात सामाजिक कार्यकर्त्या संगिता वानखेडे यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात आता मराठा आरक्षणाला वेगळंच वळण लागलं असून राज्यात याची एकच चर्चा सुरू झाली आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका वाक्यात विषय संपवून टाकला आहे.
अंतरवाली सराटीत कोणत्याही बैठकीत मनोज जरांगे पाटील कोणाचाही ऐकत नव्हते. त्याठिकाणी फक्त त्यांना एक फोन यायचा आणि त्याच व्यक्तीचं जरांगे पाटील ऐकत होता. ती व्यक्ती म्हणजे शरद पवार. शरद पवारांचाच जरांगे पाटील ऐकत आहे. अन्य कुठल्याही व्यक्तीचा ऐकत नाही. तसेच सर्व आंदोलनाचा खर्च हा शरद पवारांनी उभारलेला आहे. असं संगिता वानखेडे यांनी म्हटले. त्यावर विचारले असता. रोहित पवार म्हणाले की, त्या कोण आहेत ? याचा अभ्यास करावा लागेल. योग्य व्यक्तीने टिका केली तर मी त्यावर बोलतो, असं रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा…जरांगे पाटलांना तो फोन नेमका कुणाचा आला ? आंदोलनाला पैसे कोण पुरवायचा ? आता पर्यंतचा सर्वात मोठा गौफ्यस्फोट
शरद पवार अंतरवाली सराटीत आल्यानंतर जरांगे पाटलांचे हावभाव पाहूनच मला त्याठिकाणी समजून आलं होतं. परंतु इतक्या वर्षाने मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे. त्यामुळे मी त्याठिकाणी गप्प बसलो, त्यामुळे आता नाही फुटायचे असे मी ठरवले. असेही त्या म्हणाल्या. जरांगे पाटील काल बोलला की असे १० ते १२ अजय बारस्कर बाहेर येतील. कारण जरांगे पाटलांना माहिती होतं की, आपलं सगळं बाहेर येईल. त्यांचे काही सहकारी फुटलेले आहेत. त्यांचे मतं लोकांना पटलेली नाहीत. असे अनेक १०० टक्के लोक बाहेर येणार आहेत.
हेही वाचा…जागा वाटपाच्या मुद्यावरून शिंदे गटाचा खासदार वैतागला, म्हणाला, “आम्हाला काहीच सांगितलं जात नाहीय…”
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेत आहे. छगन भुजबळांना याआधी देखील मोठा विरोध केला आहे. जरांगेंच्या पाटलांच्या बाजूने अनेकदा भूमिका मांडली आहे. परंतु त्यानंतर भुजबळांच्या कार्यकर्त्यांकडून मला सोशल मीडिया, तसेच व्हिडीओ कॉल, करून मला ट्रोल, तसेच अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली. याचा फक्त उल्लेख करण्यासाठी जरांगे पाटलांकडे विनंती केली होती. पंरतु त्यांनी मला वाकड्या भाषेत उत्तर दिलं. त्यानंतर फेसबुक लाईव्ह दरम्यान, विषाची बाटली घेऊन मी बसली की मला ट्रोल करू नका. तरीदेखील माझ्यासह मुलींना देखील ट्रोल करण्यात आले.
सरतेशेवटी उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला साताऱ्याला बोलवलं. तरी देखील जरांगे याबाबत काही बोलला नाही. त्यांनी फक्त समाजाची फसवणूक केली आहे. अंतरवाली सराटीत दंगल पेटल्यानंतर जरांगे पाटील समोर आला. नाही तर जरांगे कोण आहे ? हे कुणालाच माहिती नव्हतं. त्यामुळे अंतरवाली सराटीत जी दंगल झाली. ती नेमकी जरांगे पाटलांनीच घडवली का ? याबाबत आता शंका यायला लागली आहे. असा दावा देखील त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“आजी माजी, नाराज, जुने पुराने सर्व एकत्र या, आपण क्रांती घडवू,” करूणा मुंडेंचं सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन
हेही वाचा…“..तर मी राजकारणातून संन्यास घेऊन, ” राधाकृष्ण विखे पाटलांनी राऊतांना दिलं खुल चॅलेंज
हेही वाचा..“याच दिवशी शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले,” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
हेही वाचा…“पक्षात चहाड्या व षडयंत्र रचणाऱ्यांना महत्व, राजकीय आयुष्य बर्बाद करू नका,” ठाकरे गटातील महिला नेत्याचा राजीनामा
हेही वाचा…अखेर इंडिया आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, मोदी विरोधात विरोधकांची जोरदार रणनिती