मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक जण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचं कारण देखील तितकचं महत्वाचं ठरतांना दिसत आहे. रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी जमीन प्रकरणाचा पुनर्विचार करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने दर्शवली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी केलेला दावा आता खरा ठरतांना दिसत आहे.
हेही वाचा…“जरांगेंना शरद पवारांचा फोन, आंदोलनासाठी पैसे,” वानखेडेंच्या आरोपावर रोहित पवारांचं तीन ओळीत उत्तर, म्हणाले…
जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे मागील काही दिवसापासून वायकर अडचणीत सापडले आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये या प्रकरणाबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर वायकरांवर चौकशीचा ससेमीरा कायम राहिला असून त्यासंदर्भात गुन्हीही दाखल करण्यात आला आहे. मध्यतंरी त्यांच्या घरावर ईडीने छापा देखील टाकला होता. यातच आता मुंबई महानगरपालिकिने जोगेश्वरी जमीन प्रकरणाचा पुर्नविचार करण्याची तयारी दाखवली आहे.
हेही वाचा..“आजी माजी, नाराज, जुने पुराने सर्व एकत्र या, आपण क्रांती घडवू,” करूणा मुंडेंचं सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन
जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरण न्यायालयात दाखल झालं. त्यानंतर या प्रकरणावर सुनावणी होत मुंबई महानगरपालिकेने याप्रकरणीची तपासणी पुन्हा करण्याचे ठरवले आहे. याआधी संजय शिरसाट यांनी रवींद्र वायकर लवकरच शिंदे गटात येणार आहेत. असं भाकित वर्तवलं होतं. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयानंतर वायकर लवकरच शिंदे गटात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, रवींद्र वायकर यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप लावले होते. तसेच त्यांची ईडीकडून चौकशी व्हावी, अशी देखील त्यांनी मागणी केली होती. तर रवींद्र वायकर यांच्यावर ईडीचा दवाब असल्याचं संजय राऊत यांनी म्हटले होते.
READ ALSO :
हेही वाचाबाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांचं निधन, उद्धव ठाकरेंनी नियोजित दौरा केला रद्द
हेही वाचा..“ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला”, भाजपच्या आणखी एका आमदाराचं निधन
हेही वाचा…“वाजवा तुतारी, गाडा गद्दारी”, शरद पवार गटाला अखेर मिळालं ‘तुतारी’ चिन्ह, आयोगाचा मोठा निर्णय
हेही वाचा..महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ हरपला..! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दु:खद निधन
हेही वाचा“हाताचा मटनाचा वास गेला असेलच…”उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहित शिल्पा बोडसेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र