मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकींचा पडघम काही दिवसात वाजणयाची शक्यता आहे. त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुक लढवून दिल्लीत जाणार अशा चर्चा सुरू आहेत. यातच कधी ते नागपुर सोडून पुणे लोकसभेची निवडणुक लढविणार अशीही चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व गोष्टींवर आता देवेंद्र फडणवीस यांनी पुर्णविराम दिला आहे.
हेही वाचा…बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांचं निधन, उद्धव ठाकरेंनी नियोजित दौरा केला रद्द
एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाचं भाष्य केलं आहे. यातच तुम्ही दिल्लीत जाणार का ? त्यावर त्यांनी मी दिल्लीमध्ये जाणार नाही. दिल्लीच्या वातावरणाचा अनुभव घेऊन मी परत मुंबईत येतो. आम्ही दिल्लीमध्ये राहत नाही. कारण दिल्लीपेत्रा मुंबईचे वातावरण चांगलं आहे. राज्यात जे वातावरण गरम वाटतंय. त्याचे कारण जनतेनेन दिलेल आहे. बहुमत नाकारले गेले. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मागच्यापेक्षा आहे. परंतु मागच्यापेक्षा चांगली कामगिरी यावेळी आमची राहिल. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा..“ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला”, भाजपच्या आणखी एका आमदाराचं निधन
आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्हाला किती जागा मिळणार ? यावर देखील त्यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर आव्हान काहीच दिसत नाही असं मी म्हणणार नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम्ही लोकसभेच्या४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. आता आम्हाला त्यापेक्षा पुढे जायचं असेल तर मेहनत घ्यावीच लागणार आहे. परंतु आम्ही गेल्या दोनवेळेच्या जागांपेक्षा खाली येणार नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“तुमचा संपूर्ण भाजप जळून खाक होईल, एवढी ताकद माझ्या महाराष्ट्रात “
हेही वाचा.मोठी बातमी…! ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराच्या निकटवर्तीयावर ईडीची कारवाई
हेही वाचा…शिरूरचा दावा आढळराव पाटलांनी सोडला, कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट कुणाला उमेदवारी देणार ?
हेही वाचा…“अजिदादांनीच पवार कुटुंबाला एकटं पाडलं,” शरद पवारांचा पणतुचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा शिंदे गटात दाखल होणार, तारिख ठरली