मुंबई : मनोज जरांगे पाटलांनी अजय महाराज यांच्यावर आरोप केल्यानंतर आज पुन्हा अजय महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवर पलटवार केला. यावेळी अजय महाराज यांनी पुन्हा एकदा लोणावळ्यातील बंद दाराआड झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. तर अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी केली होती. मग वाशीत गेल्यानंतर जरांगे पाटील पलटून गेले. असे अजय महाराज यांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच गाजत आहे.
हेही वाचा…“तुतारी एका संघर्षाची सुरूवात करण्याची प्रेरणा”, शरद पवारांनी रायगडावरून शड्डू ठोकला
अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघतांना जरांगे पाटलांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र लोणावळ्यात बंद दाराआड बैठक झाली. त्यानंतर वाशीत गेल्यानंतर त्यांना आता काय झालं की, त्यांनी सरसकट मागणी बदलून सगेसोयऱ्यांची मागणी केली. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला फसवलं आहे. असेही ते म्हणाले.
मी आरक्षणावर प्रश्न केला. माझ्यावर विनयभंगाचा आरोप केला. माझ्यावर जे आरोप झाले त्यावर मी चौकशीसाठी जायाला तयार आहे. नार्को, ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर टेस्टसाठी मी तयार आहे. एक दिवस असा येईल की तुझे सगळे काळेधंदे बाहेर येतील आणि मराठा समाज तुला दगडं मारेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
हेही वाचा.…“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
दरम्यान, अजय महाराज यांनी यावेळी मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्याचे व्हिडीओ फुटेज देखील दाखवले. तसेच यावेळी माझ्यावर त्यांनी अनेक आरोप केले आहेत. यातच मला मारण्यासाठी लोक खाली बसले आहेत. मराठा समाज उगागच माझ्यावर नाराज आहेत. परंतु सत्य परिस्थिती वेगळी आहे. मनोज जरांगे पासून आंदोलन सुरू आहे अन् त्याच्यापर्यंतच आंदोलन संपणार आहे. त्याच्यासोबत आणखी कोणीही नाही. असेही अजय महाराजांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…वंचितचा ३९ कमली अजेंडा आघाडीने स्विकारला, आता जागावाटप बाकी, किती जागा मिळणार ?
हेही वाचा…“तुतारी चिन्हांचं रायगडावर अनावरण,” भाजपला चांगल्याच मिरच्या झोंबल्या, म्हणाले…
हेही वाचा...तुतारी वाजवण्याचं मिटकरींचं चॅलेंज आव्हाडांकडून पुर्ण, एक लाखाचं चेक तयार पण…
हेही वाचा…“नांदेडमध्ये ‘कॉंग्रेसचा बुरूज’ ढासळला,” अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
हेही वाचा…“ते काय हळदीकुंकू आहे का, भांडण झालं म्हणून जायचं नाही ?”सुळेंवर टिका करणाऱ्या चाकणकरांची हवाच काढली