मुंबई : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या गुरूवारी २२ फेब्रुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये ३९ जागांवर एकमत झाले असून लवकरच २७ किंवा २८ फेब्रुवारीला औपचारिक आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्याबाबत रमेश चेन्निथला यांनी वंचितचा किमान समान कार्यक्रम स्विकारला असून यावर आता वंचितकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
हेही वाचा…“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
वंचितचा किमान समान कार्यक्रम महाविकास आघाडीने स्विकारला आहे. परंतु महाविकास आघाडीत वंचितचा समावेश अद्याप झालेला नसल्याचे चेन्निथला यांनी सांगितले आहे. यावर किमान समान कार्यक्रमासाठी आमचा प्रस्तावित 39 कलमी अजेंडा काँग्रेसने स्वीकारल्याचे आम्ही स्वागत करतो. आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना विनंती करतो की, त्यांनी किमान समान कार्यक्रमासाठी त्यांचे प्रस्ताव दाखवावे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप-आरएसएसच्या लोकशाही आणि जनताविरोधी सरकारपासून स्वतःला वेगळे करण्यासाठी आणि आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने तिन्ही पक्षांच्या सूचनांसह किमान समान कार्यक्रम तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे वंचितच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा.…“तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, आम्ही ४५ जागा जिंकणारच”, भाजपच्या नेत्याने डिवचलं
तसेच पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, बाळासाहेब आंबेडकर यांच्या कालच्या अकोल्यातील पत्रकार परिषदेतील विधान आम्ही तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो. महाविकास आघाडीत आत्तापर्यंत जागा वाटपासंदर्भात काय ठरलंय, हे वंचित बहुजन आघाडीला कळवावं, अशी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. आम्ही हीच मागणी 2 फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडेट हॉटेलमध्ये झालेल्या तीन पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच्या शेवटच्या बैठकीतही केली होती. महाविकास आघाडीने जागा वाटपासंदर्भातील भूमिका वंचित बहुजन आघाडीला सांगितल्यास, 3 पक्षांना वैयक्तिकरित्या किती जागा दिल्या आहेत हे समजायला मदत होईल. तसेच, तीन पक्षांना किती जागा मिळाल्या आहेत, हे कळल्यावर त्या पक्षांशी वंचित बहुजन आघाडीला काही जागांसाठी वाटाघाटी करता येतील. असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“आमदार आहेस, लय गल्लीतल्या गप्पा मारू नकोस, बाजारू विचारवंत,” पवार गटाने मिटकरींची बोलतीच केली बंद
दरम्यान, जर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेस/शिवसेना यांना दिला गेल्यास, आम्ही ज्या पक्षाला मुंबई दक्षिण मध्य दिला आहे. त्यांच्याशी वाटाघाटी करू, पण वाटाघाटी होण्यासाठी मुंबई दक्षिण मध्य किंवा कोणत्या पक्षाला त्यांच्या कोट्यातील कोणता मतदारसंघ मिळाला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही 3 पक्षांमध्ये तुमच्या ठरलेल्या जागांची माहिती कोणत्याही प्रसारमाध्यमातून किंवा वृत्तपत्राद्वारे आम्हाला कळवा. जेणेकरून, जागावाटपाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवता येईल. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसांच्या आत त्यांच्या जागांच्या वाटपांची माहिती दिली (डेडलाइन नाही पण आमच्या सोयीसाठी) तर आम्हाला निर्णय घेणे सोपे होईल. आम्ही तुम्हाला जागा वाटपासंदर्भात माहिती पुरविण्याची विनंती करतो, जेणेकरुन आम्हाला कोणासोबत बसायचे आहे, चर्चा करायची आहे हे ठरवता येईल. तसेच, आगामी निवडणुकीत मोदी आणि भाजप-आरएसएसचा पराभव करण्यासाठी जागांची तडजोड करण्यास सोपं जाईल. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“तुतारी चिन्हांचं रायगडावर अनावरण,” भाजपला चांगल्याच मिरच्या झोंबल्या, म्हणाले…
हेही वाचा...तुतारी वाजवण्याचं मिटकरींचं चॅलेंज आव्हाडांकडून पुर्ण, एक लाखाचं चेक तयार पण…
हेही वाचा…“नांदेडमध्ये ‘कॉंग्रेसचा बुरूज’ ढासळला,” अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
हेही वाचा…“ते काय हळदीकुंकू आहे का, भांडण झालं म्हणून जायचं नाही ?”सुळेंवर टिका करणाऱ्या चाकणकरांची हवाच काढली
हेही वाचा…“तुतारी एका संघर्षाची सुरूवात करण्याची प्रेरणा”, शरद पवारांनी रायगडावरून शड्डू ठोकला