मुंबई : आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटलांनी आपल्या उपोषणाच्या ठिकाणाहून मुंबईत जाण्याचा इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी जालना जिल्ह्यातील अबंड तालुक्यात संचारबंदी लागू केल्यानंतर जरांगे पाटलांना भांबरी गावातूनच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला.यातच आता मनोज जरांगे पाटलांच्या तीन सहाकार्यकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे राज्यात आगामी काही दिवसात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. यातच आता मनोज जरांगे पाटलांच्या बोलण्यातून राजकीय वास येऊ लागला आहे. आमच्या नेत्यांवर टिका केली तर त्याला आम्ही प्रत्युत्तर देणारच अशी भूमिका मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली आहे.
हेही वाचा…जरांगे पाटलांनी मराठा समाजाला फसवलं, अजय महाराजांचा पुन्हा जोरदार घणाघात, पुराव्यासगट सगळचं दाखवलं
शंभुराज देसाई म्हणाले की, मराठवाड्यातील ९ जिल्ह्यांतील पुर्वजणांकडे कुणबी नोंदी होत्या. त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. ती मागणी सरकारने मान्य केली. परंतु महाराष्ट्रातील सगळ्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी झाली. याबाबत देखील सरकारने ड्राईव्ह घेतला अन् स्वतंत्र यंत्रणा लावली. त्यानंतर जेव्हा स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली तेव्हा देखील आयोग नेमला, अहवाल आला आणि एक लाखापेक्षा जास्त लोकांना कामाला लावले आणि त्यानुसार माहिती गोळा केली. आणि त्यानुसार कोर्टात टिकणारं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला. इतकं करून देखील जरांगे पाटलांची रोजरोज भूमिका बदलायला लागली. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकाऱ्याची भूमिका घेण्यासाठी गेलेल्या लोकांवर आरोप केलेत. याचा अर्थ जरांगे पाटील आपली रोज रोज भूमिका मांडत आहेत.
हेही वाचा…वंचितचा ३९ कमली अजेंडा आघाडीने स्विकारला, आता जागावाटप बाकी, किती जागा मिळणार ?
यात कहर म्हणजे जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरे तुरेची भाषा केली. असंसदीय शब्द वापरले. याच्याबाबतीत मराठा समाजात तीव्र नाराजी आहे. आधी म्हणाले की मी सागर बंगल्यावर पायी चाललो, मग गाडीत बसले, मग एका गावात जाऊन थांबले. मग एका ग्रामस्थांनी आग्रह केला म्हणून पाणी प्यायले आणि पुन्हा माघारी फिरले अन् आपल्या गावी गेले. यातच आज पुण्यात शस्त्रांचा एक्सो होता. तिथे फडणवीसांनी भेट दिली.त्या भेटीदरम्यानचा फोटो फडणवीसांनी सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर जरांगे म्हणाले की, मला गोळी मारण्यासाठीच तो फोटो टाकला गेला. म्हणजे एका बाजूला स्वत: म्हणायचे की मी सागर बंगल्यावर येतो अन् दुसऱ्या बाजूला मला गोळी मारण्यासाठी सागर बंगल्यावर फडणवीसांनी बोलावलं आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या बोलण्यातून आता राजकीय वास यायला लागला आहे. असा आरोप देखील शंभुराज देसाई यांनी केला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांना पाठीमागे कुणीतरी सांगताहेत. अन् ते बोलताहेत. यातच जे सहकारी त्यांच्यासोबत आंदोलनाला बरोबर होते. त्यांच्यावर देखील जरांगे पाटील आरोप करत आहेत. सतत आंदोलन केल्यामुळे उपोषणामुळे प्रकृतीला आराम मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यांनी आता उपोषणातून आराम घेतला पाहिजे आणि सरकार केव्हाही कुणासोबत चर्चेसाठी नेहमी तयार आहे. त्यामुळे त्यांची काय भूमिका आहे. त्यांनी सरकारसोबत यावं, सरकारचं दारं केव्हीही खुलं आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगेंच्या सहकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड, तीन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
हेही वाचा…“एकनाथ खडसे यांनी भाजपात यावं असं मी आवाहन केलंच नाही,” रक्षा खडसेंचं घुमजाव
हेही वाचा…“राजकारणात मला कुणीही संधी दिली नाही ती अपघातानेच मिळाली”, अजित पवारांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा.जागा एक, इच्छूक तीन, शिरूर लोकसभेसाठी महायुतीत कुर्बानी देणार कोण ?
हेही वाचा…“जरांगेंचे काळेधंदे बाहेर आले तर मराठा समाज दगडं मारतील”, अजय महाराज जरांगेंवर बरसले