मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी बसलेले शेतकऱ्यांनी अखेर आज मंत्रालयात येऊन संरक्षण जाळीवर उड्या मारत राज्य सरकारला आत्महत्येचा इशारा दिला. यामुळे मंत्रालयात मोठा गोंधळ बघायला मिळाला. यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. यावरून आता राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
हेही वाचा…अन् धरणग्रस्तांनी थेट मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेतल्या, मंत्रालयात एकच गोंधळ
गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक दिवसापासून अप्पर वर्धा धरणगस्त शेतकरी आंदोलन करीत आहेत. धरण बांधून जवळपास ५० वर्ष होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या जमीनाचा मोबादला सरकारकडून देण्यात आला नाही. तसेच आश्वासन देऊनही कोणत्याही प्रकारची शासकीय सेवेत धरणग्रस्तांना घेण्यात आलं नाही. यामुळे अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी आज मंत्रालयातील जाळीवर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
हेही वाचा…“आजचा पाठ म्हणजेच कानामागून आली आणि तिखट झाली”, काॅंग्रेसने चंद्रकांत पाटलांना डिवचलं
दरम्यान, शासन आपल्या दारी, जाहिरात करत आहे, जनता मंत्रालयात आंदोलन करत आहे. असा टोला प्रशांत जगताप यांनी राज्य सरकारला लगावला आहे. दरम्यान, शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन आरसा दाखवला आहे. अमरावती येथील धरणग्रस्त शेतकरी गेले १०३ दिवस आंदोलन करत होते. त्यांची दखल प्रशासन असो की सरकारने घेतली नाही. त्यामुळे त्यांना मंत्रालयात आंदोलन करण्याची वेळी आली आहे. जाळ्यावर उड्या मारून जीव धोक्यात घालून त्यांनी आंदोलन केले आता तरी सरकार या प्रश्नांकडे लक्ष देणार का ? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
“शासन आपल्या दारी” जाहिरात करत आहे,
जनता मंत्रालयात आंदोलन करत आहे. pic.twitter.com/109ud6acmn— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) August 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या कन्याला राष्ट्रवादीत बळ मिळालं, राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली सुरू
हेही वाचा…शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्कातंत्र, बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी, तर खडसेंच्या कन्यालाही लागली लॉटरी
हेही वाचा…“अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्राद्वारे केली ही महत्वाची मागणी”
हेही वाचा…““मोदी सरकारची जनतेला मोठी भेट, सिलिंडर ‘इतक्या’ किमंतीने लवकरच स्वस्त होणार ‘ “
हेही वाचा…“शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन दाखवला आरसा”