मुंबई : मुंबईतल्या सुमारे ५५ उड्डाणपुलांचा खर्च वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडल यांनी एमईपी इंफ्रास्टक्चर या कंपनीस सन २०१० पासून मुंबई च्या इंन्ट्री पॉईंटचा टोल वसूल करण्याचे कंत्राट दिले असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं आहे.
हेही वाचा…सरकारचा हलगर्जीपणा..,! “केंद्राने निर्यात शुल्क लावले, बंदरात ८०० टन कांदे सडले!
उड्डाणपुलासाठी झालेल्या खर्चाची वसूली पुर्ण होऊनही एमईपी या कंपनीकडून टोल वसूली सुरूच आहे. त्याचा नाहक भुर्दड राज्यातील सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याचप्रमाणे राज्यातील अनेक टोलसंदर्भात खर्च वसूली पुर्ण होवून देखील गत काही वर्षांपासून टोल वसूली सुरु आहे. टोल वसुलीची खरी आकडेवारी संबंधित कंपन्यांकडून लपविली जात आहे. असा आरोप देखील त्यांनी केलाय.
हेही वाचा…“५० खोक्यांच्या जीवावर पक्ष फोडून महाराष्ट्रात चिखल करणाऱ्या भाजपविरोधात इंडियाची बैठक”
यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता रस्ते, उड्डाणपुल यासाठी झालेला खर्च, टोल वसुलीचा कालावधी तसेच टोल वसूलीतुन मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्यांबाबत शासनाने तातडीने श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी, अशी विनंती देखील त्यांनी केलीय.
राज्यातील टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत उड्डाणपूलांसाठी झालेला खर्च, टोल वसुलीचा कालावधी तसेच टोल वसूलीतून मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्याबाबत श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी अशी मागणी मी… pic.twitter.com/x2ejU1KxQr
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…““मोदी सरकारची जनतेला मोठी भेट, सिलिंडर ‘इतक्या’ किमंतीने लवकरच स्वस्त होणार ‘ “
हेही वाचा…“शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन दाखवला आरसा”
हेही वाचा…अन् धरणग्रस्तांनी थेट मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेतल्या, मंत्रालयात एकच गोंधळ
हेही वाचा…हेही वाचा…“आजचा पाठ म्हणजेच कानामागून आली आणि तिखट झाली”, काॅंग्रेसने चंद्रकांत पाटलांना डिवचलं
हेही वाचा…“उद्धव ठाकरे, संजय राऊतांना अटक करून कसून चौकशी करावी,” तुषार भोसलेंची मागणी