हिंगोली : राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षणाचा संघर्ष आता दिवसेंदिवस पेटत चालला आहे. यातच हिंगोलीत ओबीसी एल्गार मेळाव्यातून ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी धक्कादायक विधानं केली आहेत. ओबीसी विरोधात कुणी बोलण्याची हिंंमत केली, तर त्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, असं विधान करून राज्यात संघर्ष निर्माण करून दिला आहे. यावरून आता अपक्ष आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…भाजपचे खासदार आणि शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये जुंपली, पाणी प्रश्नावरून भाजपचा खासदार खासदारकीचा राजीनामा देणार ?
छगन भुजबळ यांनी इतके वर्षे राज्य केलं आहे. त्यांनी कापण्यापेक्षा जोडता कसं येईल? याचा विचार केला पाहिजे. ओबीसी नेते तायवाडे त्यांनाही माझा इशारा आहे की, तुम्ही हातपाय कापा आम्ही जोडण्याचं काम करू. तुमची बुद्धी इतक्या खालच्या पातळीवर गेली असेल तर मी त्याचा निषेध करतो असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक, कार्यकर्ते आक्रमक, पोलिस स्टेशनबाहेर दिला ठिय्या आंदोलन
दरम्यान, तुम्ही तुमचं आरक्षण शांततेनं मागावं. ओबीसीमध्ये मराठा घसतोय, असं काहीही नाही. कारण कोकणातला, विदर्भातला मराठा कुणबी झाला. पण चार- पाच जिल्ह्यातलाच मराठा कुणबी होत नाही. त्यासाठीच गाजावाडा होतो आहे. हे सगळं राजकीय श्रेय घेण्याचं काम आहे. ज्यांचं काहीच राहिलं नाही. त्यांचं जातीच्या नावाने चांगभलं आहे. ते आता नळावरच्या भांडणासारखं भांडायला लागले आहे. याचं मला नवल वाटतंय. असा टोलाही त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“आरक्षणावरून विविध समाजातील संघर्ष टाळायचा असेल तर..,” विलासराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला ? शरद पवारांवर भाजपचा गंभीर आरोप, राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
हेही वाचा…अबब… तब्बल सात कोटींचा अश्व; पशू प्रेमींची पाहण्यासाठी झुंबड! मोशी येथील देशी गोवंश व अश्व प्रदर्शनाला तुफान गर्दी
हेही वाचा…दैवत म्हणून शरद पवार यांचा अपमान का करताय? जितेंद्र आव्हाडांनी सुनील तटकरेंना सुनावलं
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कार्यकर्त्यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न