बुलढाणा : शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर २० नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर दिला होता. परंतु त्याआधीच रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवली जात असून कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला, भुजबळांची होणार ‘या’ ठिकाणी जंगी सभा, रॅलीचंही आयोजन
कापुस सोयाबीनसाठी २० नोव्हेंबरला बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना एल्गार मोर्चा काढून सरकारला दिला होता. त्यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईला धडक देऊन २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेऊ असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला होता. त्यानंतर शुक्रवारी त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. परंतु अशा नोटीशींना आपण भीक घालत नसल्याचं सांगत तुपकर आक्रमक झाले होते.
हेही वाचा…“पद टिकवण्याचाच हा खटाटोप बाई”, सुळेंवर टिका अन् रोहिणी खडसेंनी चाकणकरांना दिलं प्रत्युत्तर
दरम्यान, रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. पोलीस स्टेशन समोरील झाडावर नितीन राजपूत हा कार्यकर्ता चढला. त्याने यावेळी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. परंतु पोलिसांनी वेळत त्याला खाली उतरवल्याने अपघात टळला. तर रविकांत तुपकर यांच्या पत्नी देखील पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन करीत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपचे खासदार आणि शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये जुंपली, पाणी प्रश्नावरून भाजपचा खासदार खासदारकीचा राजीनामा देणार ?
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक, कार्यकर्ते आक्रमक, पोलिस स्टेशनबाहेर दिला ठिय्या आंदोलन
हेही वाचा…पंकजा मुंडेंवर खरंच अन्याय झाला आहे का ? शिंदे गटाच्या दाव्यानंतर भाजपकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…“मुस्लिम महिलांचा संसार वाचवण्याचं काम मोदींनी केलं, त्यामुळे २०२४ ला मोदीच येणार”
हेही वाचा…शिंदेंचा गड ठाकरेंकडून उद्धवस्त, २५० पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात केला जाहीर प्रवेश