सांगली : महाराष्ट्रात या वर्षी पाऊस कमी पडल्याने अनेक ठिकाणी दुष्काळस्थिती परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच आता पाणी प्रश्नावरून संघर्ष सुरू झाला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी प्रश्नावरून नाशिक नगर विरूद्ध मराठवाडा असा संघर्ष बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे सांगली आणि सातरा जिल्ह्यात कोयना धरणाच्या पाणी प्रश्नावरून संघर्ष सुरू आहे. यावरून आता भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा…“पद टिकवण्याचाच हा खटाटोप बाई”, सुळेंवर टिका अन् रोहिणी खडसेंनी चाकणकरांना दिलं प्रत्युत्तर
कोयना धरणातून पाणी अडवणूक प्रकरणी भाजप खासदार संजय काका पाटील यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यात कोयना- कृष्णा पाणी संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यावरून महायुती मध्येही संघर्ष पेटणार असं चित्र निर्माण झालं आहे.
हेही वाचा…राजस्थानच्या १९९ विधानसभा जागांसाठी मतदान सुरू, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये काटे की टक्कार
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाटील यांनी सडकून टिका केली आहे. कोयना धरणाचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही, मंत्री देसाई यांची लुडबुड खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हक्काचे पाणी घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक, कार्यकर्ते आक्रमक, पोलिस स्टेशनबाहेर दिला ठिय्या आंदोलन
हेही वाचा…पंकजा मुंडेंवर खरंच अन्याय झाला आहे का ? शिंदे गटाच्या दाव्यानंतर भाजपकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…“मुस्लिम महिलांचा संसार वाचवण्याचं काम मोदींनी केलं, त्यामुळे २०२४ ला मोदीच येणार”
हेही वाचा…शिंदेंचा गड ठाकरेंकडून उद्धवस्त, २५० पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात केला जाहीर प्रवेश
हेही वाचा…ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला, भुजबळांची होणार ‘या’ ठिकाणी जंगी सभा, रॅलीचंही आयोजन