मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली परंतु त्यांच्या मंत्रिमंडळाचा ऊरर्वित विस्तार अद्यापही झालेला नाही. यावरून शिंदे फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही. असं सुचक वक्तव्य अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
“सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख”, अजित पवारांचं राजकीय घडामोडींवर भाष्य
हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणे हे कधीही चुकीचंच असतं हा सुविचार शिंदे-फडणवीस सरकारसोबतच्या बंडखोर आमदारांना आता रोजच आठवत असावा. इच्छुकांच्या तोंडाला नेहमीच पानं पुसली जात असल्यामुळे त्यांची खदखद सारखी बाहेर पडत आहे. मंत्रिमंड़ळ विस्ताराबाबत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली वेदना मांडताना आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तार हा 2024 लाच होईल असे विधान केले आहे.
राज्यातील घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरणार.! अजित पवारांनी दिले संकेत
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पे तारीख ही भूमिका अनेक बंडखोर आमदारांना बोचत आहे. बच्चू कडू यांच्याप्रमाणेच स्वप्नभंग झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी आता मंत्रिमंडळ विस्ताराची आणि त्यात संधी मिळण्याची आशाच सोडली आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना मिळालेला मान-सन्मान आणि विश्वासाचा आता पुर्णपणे अभाव झाल्याने अशी खदखद बाहेर येणं स्वाभाविक आहे. असाही टोला राष्ट्रवादीने हाणला आहे.
Read also
- शिवसेना नेमकी कुणाची? तोपर्यंत धनुष्यबाणांवर सुनावणी घेऊ नका, ठाकरे गटाच्या वकिलाचा युक्तिवाद
- “मी भजन जरी गायलं तरी लोक मला ट्रोल करतील, त्यामुळे मी..;” अमृता फडणवीस
- “हो मी उपटसुंभ, पवार कुटुंबाला उपटून टाकणार”; पडळकरांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून किरण पाटील, राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंची चर्चा
- “राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या इडी सरकारकडून सुरूय”