नागपूर : सध्याचं महाराष्ट्रातील सरकार लोकशाहीला हरताळ फासण्याचं काम करतानाचं चित्र दिसत आहेत. एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा कारभार पाहत आहे. त्या प्रत्येक जिल्ह्यातील लोकांवर अन्याय करतानाचं दिसत आहे. सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री आहे. दर महिन्याला त्या जिल्हात जाऊन त्या जिल्हाचा आढावा घेण्याची गरज आहे. लोकांचे प्रश्न समजून घेतलं पाहिजे. त्या प्रश्नांना न्याय दिला पाहिजे. परंतु जनतेच्या प्रश्नापेक्षा स्वत:च्या मौजमस्तीमध्ये आणि राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या इडी सरकार करीत आहे. अशी टिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
“संजय राऊतांची ती भविष्यवाणी खोटी ठरणार”; मंत्री दिपक केसरकर
आज काॅंग्रस कमिठी बैठक होत आहे. या बैठकीत महागाई, बेरोजगारी, म्हणजे जनतेच्या प्रश्नावर चर्चा केली जात आहे. परंतु लोकांना भटकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या समृद्धी महामार्गाची वावाही महाराष्ट्राच्या विधानसभेत करायचे. त्या महामार्गावर 100 पेक्षा जास्त लोकांचा अपघातात जीव गेला आहे. हा श्रीमंताचासाठी रस्ता असून तो गरीबांसाठी नाही. समृद्धी महामार्गासाठी घेतलेलं हजारो कोटीचं कर्ज हा महाराष्ट्रातील जनतेचं लुटायचं काम करीत आहेत.
“ऊर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तु गं सास..”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून कडाडून टिका केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
Read also
- “सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख”, अजित पवारांचं राजकीय घडामोडींवर भाष्य
- राज्यातील घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरणार.! अजित पवारांनी दिले संकेत
- “आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…;” रवी राणांना शिवसेनेचा इशारा
- “आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…;” रवी राणांना शिवसेनेचा इशारा
- “उपटसुंभ लोकांना उत्तर द्यायला मी बांधील नाही,” अजित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल