मुंबई : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या याचिकांवरील पुढील सुनावणी आता 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर राज्यात प्रेमांन सर्व काही सुरळित होईल. अन् कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागणार. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दिपक केसरकर यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
अमृता ताईंचा ऊर्फीला एक मोलाचा सल्ला..! म्हणाल्या,”ऊर्फीला मला इतकं सांगायचं आहे की…,”
या सर्व प्रकरणांबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे त्यावर बोलणं उचित ठरणार नाही. परंतु संजय राऊत यांनी जी काही भविष्यवाणी केली होती की, विरोधी निर्णय लागेल. ती भविष्यवाणी खोटी ठरेल. कारण सुनावणीच 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे त्यांची भविष्यवाणी सुधारून पाहावी. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
“तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदार अपात्र ठरतील”; कोर्टात आज ठाकरे-शिंदेंचा फैसला
कोर्टोत सुरू असलेल्या कोणत्याही निर्णयाविरोधात आम्ही काही बोलणार नाही. कारण त्यावर सुनावणी सुरू असताना न्यायालयाचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे. पण आमच्याकडील काही माणसं ते सातत्याने त्यावर प्रतिक्रिया देत असतात. शेवटी न्यायालय आपल्या प्रक्रियेप्रमाणे चालत असतो. हे निमित्ताने पाहलं पाहिजे. अन् महाराष्ट्रात कशा रितीने खोटं बोललं जात आहे. ते सर्व जनता पाहत आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“नसीब बदले या न बदले…वक्त जरूर बदलता है..!” राऊतांचं ते ट्विट चर्चेत
दरम्यान, १४ फेब्रुवारीपासून घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहेत. ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मुख्य न्यायाधीशांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील हे प्रकरण आम्ही ऐकू. असं संजय राऊतांनी म्हटलं. तसेच कोर्टात कपिल सिब्बल यांनी १४ फेब्रुवारी हे वॅलिटाईन डे आहे. शुभ दिवस आहे. त्यावर राऊत म्हणाले की, त्यादिवसापासून सर्व काही प्रेमानं होणार. असं राऊत म्हणाले.
Read also
- “ऊर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तु गं सास..”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
- “धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार, ठाकरेंसोबत फक्त तीन लोकं शिल्लक राहणार”
- “शिवसेना फोडण्याचं शरद पवारांचं नाही तर भाजपचंच जुनं स्वप्न होतं”
- सत्तासंघर्षाची सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी..! सर्व काही प्रेमानं होईल; संजय राऊत
- “खासदारकीसाठी भाजपने ऑफर दिली तरी भाजपात जाणार नाही”, ठाकरे गटाचे खासदार निंबाळकरांचं विधान