उस्मानाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात शिंदे आणि ठाकरे असा संघर्ष बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते बंडखोर आमदारांवर प्रत्येक भाषणात तुटून पडतांना दिसत आहे. यातच काल उस्मानाबाद येथे शिवसेनचे खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार बॅटिंग केली.
“ऊर्फीनंतर आता चित्रा वाघ यांनी गौतमी पाटीलकडे मोर्चा वळविला”, म्हणाल्या, तिचे व्हिडीओ..,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा देशव्यापी चेहरा असला तरी उस्मानाबादमध्ये माझीच जादू चालणार आहे. माझा छोटा चेहरा असला तरी मतदार माझा विचार करतील. असा विश्वासही ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त करून दाखवला आहे. भाजपला उस्मानाबाद लोकसभा मतदार संघांची जास्त काळजी वाटते. लोक काम पाहून मतदार करतात. जनता माझ्यापाठीमागे कायम उभी राहिल, मी प्रामाणिकपणे काम केले.
इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई भाजपात, राधाकृष्णा विखे पाटील अन् थोरातांमध्ये जोरदार दावा
बडेजाव न करता मतदारसोबत अखंडपणे नाते जपले, जे राष्ट्रवादीसोडून भाजपात गेले. त्यांच्यामुळे उस्मानाबाद जिल्हा आकांक्षित राहिला. भाजपमध्ये कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही. सत्ता जाते म्हणून ठाकरे यांच्याशी बेमानी करणार नाही, खासदारकीसाठी भाजपने ऑफर दिली तरी भाजपात जाणार नाही. असं ठासून ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले आहे.
मोठी बातमी..! “सुरतवरून गुवाहाटीला जाणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदाराला एसीबीची नोटीस”
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शिवसेनामुले इथेपर्यंत आलो, मी ठाकरे यांची प्रतारणा करणार नाही. माझे कर्तव्य आहे मी पाठीशी राहणार. तेरणा कारखाना चालू असताना कर्मचारी यांचा संप घडवून आणून आमदार राणा पाटील यांनी बंद पाडला. कारखाना सुरू होतोय. आनंद आहे. त्याला विरोध नाही. असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले.
Read also
- अमृता ताईंचा ऊर्फीला एक मोलाचा सल्ला..! म्हणाल्या,”ऊर्फीला मला इतकं सांगायचं आहे की…,”
- “तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदार अपात्र ठरतील”; कोर्टात आज ठाकरे-शिंदेंचा फैसला
- “नसीब बदले या न बदले…वक्त जरूर बदलता है..!” राऊतांचं ते ट्विट चर्चेत
- ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराच्या घरी एसीबी पोहचले..! साळवी, नाईक अन् आता नितीन देशमुख
- नेतेच असं वागणार असतील तर काय आदर्श घेणार? रोहित पवारांचा राजकीय नेत्यांना सवाल