मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री ऊर्फी जावेद यांच्यात वाद सुरू आहे. आता या वादात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे. ऊर्फी एक स्त्री आहे. ती जे काही करतेय. ते ती स्वत:साठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही. असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई भाजपात, राधाकृष्णा विखे पाटील अन् थोरातांमध्ये जोरदार दावा
चित्रा वाघ यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे की, काहींची व्यावसायिक गरज असते. त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसं फिरत असाल , तर ते ठिक नाही. ऊर्फी एक कलाकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे.असा सल्ला अमृता फडणवीस यांनी ऊर्फीला दिला आहे.
मोठी बातमी..! “सुरतवरून गुवाहाटीला जाणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदाराला एसीबीची नोटीस”
तुमचं व्यवसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं. याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार होते, ते त्यांनी प्रकट केले आहेत. त्यानुसार त्या कारवाी करत आहेत. माझा विचार असा आहे की, ऊर्फीने जिथे प्रोफेशनली कमिटमेंट्स नाही. तिथे संस्कृतीच्या हिशोबाने राहिलं तर चांगलं आहे. बाकी मला वैयक्तिक सांगायचं झालं तर ऊर्फीही एक स्त्री आहे, ती जे काही करतेय. ते ती स्वत: साठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही. असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शिवसेना कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठोकला दावा
दरम्यान, ऊर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी आवाज उठवला होता. असा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यावर ऊर्फीनेही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देत हा वाद आणखी चिघळवला. त्यातच आता महिला आयोगाने देखील चित्रा वाघ यांनी आत ढकललं आहे. त्यामुळे हे प्रकरण आता खुपच चर्चेत आलं आहे.
Read also
- “तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदार अपात्र ठरतील”; कोर्टात आज ठाकरे-शिंदेंचा फैसला
- “नसीब बदले या न बदले…वक्त जरूर बदलता है..!” राऊतांचं ते ट्विट चर्चेत
- ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराच्या घरी एसीबी पोहचले..! साळवी, नाईक अन् आता नितीन देशमुख
- नेतेच असं वागणार असतील तर काय आदर्श घेणार? रोहित पवारांचा राजकीय नेत्यांना सवाल
- “ऊर्फीनंतर आता चित्रा वाघ यांनी गौतमी पाटीलकडे मोर्चा वळविला”, म्हणाल्या, तिचे व्हिडीओ..,